शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

१६ हजार हेक्टर क्षेत्र नापेर

By admin | Updated: January 4, 2015 23:03 IST

जिल्ह्यात रबी हंगामाकरीता असणाऱ्या एकूण १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ७०८ क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१४ पावेतो पेरणी झालेली आहे. कृषी विभागाने नियोजन केल्याच्या

रबी हंगाम : अंजनगाव तालुक्यात ३६ टक्केच पेरणीअमरावती : जिल्ह्यात रबी हंगामाकरीता असणाऱ्या एकूण १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ७०८ क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१४ पावेतो पेरणी झालेली आहे. कृषी विभागाने नियोजन केल्याच्या तुलनेत हे पेरणी क्षेत्र ८९ टक्के आहे. रबी पेरणीचा कालावधी संपल्यागत असल्याने १६ हजार २५८ हेक्टर क्षेत्र नापेर राहणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पेरणीपासून पावसाने दीड महिना दडी मारली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरुवात झाली. याचा परिणाम होऊन रबी हंगामाची पेरणी दोन महिने माघारली. साधारणपणे पावसाचे १२० दिवस असतात व ८०० ते ८५० मि. मी. पावसाची सरासरी असायला पाहिजे परंतु यंदा ५५० मि. मी. पाऊस पडला. त्यामुळे रबी हंगाम पेरणीसाठी जमिनीत पुरेसी आर्द्रता नसल्याने हरभऱ्याची उगवणशक्ती कमी झाली. जिल्ह्यात ९० टक्के पेरणीक्षेत्रात कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी केल्या जाते. मात्र हलक्या प्रतिच्या जमिनीत पुरेश्या आर्द्रतेमुळे रबीची पेरणी झालेली नाही. परिणामी असे १२ हजारावर हेक्टर क्षेत्र नापेर राहीले आहे. या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला. मात्र रबी हरभरा पेरणीचा अंतिम कालावधी १५ नोव्हेंबर पावेतो असतो त्यामुळे आता कालावधी संपल्यानंतर हरभरा पेरणी शक्य नाही. त्यामुळे या पाऊसाचा फायदा पेरणी झालेल्या हरभरा, गहू पिकाला होणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत धारणी तालुक्यात १४,६७६ हेक्टर, चिखलदरा ४४६०, अमरावती ८०९०, भातकुली ७९४४, नांदगाव खंडेश्वर ९७६०, चांदूररेल्वे ६१६८, तिवसा ९१७६, मोर्शी ७८६६, वरूड ७३२४, दर्यापूर २०५९२, अंजनगाव ६६७६, अचलपूर ५६२७, चांदूरबाजार ९६२२, धामणगाव १३,७२७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी आटोपली आहे. रबीचा हंगाम दोन महिने माघारल्याने याचा विपरीत परिणाम उत्पन्नावर होणार आहे. (प्रतिनिधी)