शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार हेक्टर क्षेत्र नापेर

By admin | Updated: January 4, 2015 23:03 IST

जिल्ह्यात रबी हंगामाकरीता असणाऱ्या एकूण १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ७०८ क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१४ पावेतो पेरणी झालेली आहे. कृषी विभागाने नियोजन केल्याच्या

रबी हंगाम : अंजनगाव तालुक्यात ३६ टक्केच पेरणीअमरावती : जिल्ह्यात रबी हंगामाकरीता असणाऱ्या एकूण १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ७०८ क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१४ पावेतो पेरणी झालेली आहे. कृषी विभागाने नियोजन केल्याच्या तुलनेत हे पेरणी क्षेत्र ८९ टक्के आहे. रबी पेरणीचा कालावधी संपल्यागत असल्याने १६ हजार २५८ हेक्टर क्षेत्र नापेर राहणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यात पेरणीपासून पावसाने दीड महिना दडी मारली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरुवात झाली. याचा परिणाम होऊन रबी हंगामाची पेरणी दोन महिने माघारली. साधारणपणे पावसाचे १२० दिवस असतात व ८०० ते ८५० मि. मी. पावसाची सरासरी असायला पाहिजे परंतु यंदा ५५० मि. मी. पाऊस पडला. त्यामुळे रबी हंगाम पेरणीसाठी जमिनीत पुरेसी आर्द्रता नसल्याने हरभऱ्याची उगवणशक्ती कमी झाली. जिल्ह्यात ९० टक्के पेरणीक्षेत्रात कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी केल्या जाते. मात्र हलक्या प्रतिच्या जमिनीत पुरेश्या आर्द्रतेमुळे रबीची पेरणी झालेली नाही. परिणामी असे १२ हजारावर हेक्टर क्षेत्र नापेर राहीले आहे. या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला. मात्र रबी हरभरा पेरणीचा अंतिम कालावधी १५ नोव्हेंबर पावेतो असतो त्यामुळे आता कालावधी संपल्यानंतर हरभरा पेरणी शक्य नाही. त्यामुळे या पाऊसाचा फायदा पेरणी झालेल्या हरभरा, गहू पिकाला होणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत धारणी तालुक्यात १४,६७६ हेक्टर, चिखलदरा ४४६०, अमरावती ८०९०, भातकुली ७९४४, नांदगाव खंडेश्वर ९७६०, चांदूररेल्वे ६१६८, तिवसा ९१७६, मोर्शी ७८६६, वरूड ७३२४, दर्यापूर २०५९२, अंजनगाव ६६७६, अचलपूर ५६२७, चांदूरबाजार ९६२२, धामणगाव १३,७२७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी आटोपली आहे. रबीचा हंगाम दोन महिने माघारल्याने याचा विपरीत परिणाम उत्पन्नावर होणार आहे. (प्रतिनिधी)