शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

संचारबंदीच्या काळात वाढले १५ हजार पॉझिटिव्ह, रोजच्या चाचण्यानंतरही रुग्ण कमी होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:13 IST

जिल्ह्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केली. यावेळी जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५४,४९७ होती, त्यानंतर ३० तारखेला संचारबंदी संपल्यानंतर ...

जिल्ह्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केली. यावेळी जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५४,४९७ होती, त्यानंतर ३० तारखेला संचारबंदी संपल्यानंतर पुन्हा १५ दिवसांसाठी मुदत वाढविण्यात आलेली आहे. सध्या या २० दिवसांत म्हणजेच ४ एप्रिलपर्यत जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तामची संख्या ६९,५२७ वर पोहोचली आहे. म्हणजेच १५ हजारांवर रुग्ण या काळात नोंद झालेले आहे.

तसे पाहता जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली व याला अटकाव करण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्रीला संचारबंदी लागू करण्यात होती. मात्र, यानंतर संसर्ग वाढताच असल्याने पुन्हा १५ दिवसां दोन टप्प्यात संचारबंदी वाढविण्यात आलेली आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. या काळात जीवनावश्यकशिवाय अन्य दुकाने बंद आहेत. त्यामुळे सुपरस्प्रेडरला आता अटकाव झालेला झालेला सकाळी ७ ते ११ या दरम्यानच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा आहे. तरीही संसर्ग वाढताच असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत ३,०५,४७८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. चाचण्यांसाठी युवकांसह ज्येष्ठाची मोठी गर्दी होत आहे. मात्र, लसीचा पुरवठा नसल्याने लोकांना परत जावे लागत आहे.

बॉक्स

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढतीच

१) जिल्ह्यात तसे पाहता मार्च महिन्यापासूनच संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मात्र, पुरेसी अंमलबजावणी होत नसल्याने रस्त्यांवर गर्दी दिसून येते. फिजिकल डिस्टनचा वापर कुठेही होताना दिसत नाही.

२) दंडात्मक कारवाया आता कमी झालेल्या दिसत आहे. ग्रामिणमध्ये यंत्रणाद्वारा पुरेशी अंमलबजावणी होताना दिसत नाही. जिल्हा व आंतर राज्य प्रवासावरची बंदी कुचकामी आहे.

३) कॉन्टक्ट ट्रेसींग कुठेच होताना दिसत नाही, त्यामुळे चाचण्यांमध्ये कमी आलेली आहे. नागरिक अंगावर लक्षणे काढत असल्याने संसर्गासोबतच आता मृत्त्यूदरात वाढ झालेली दिसत आहे.

बॉक्स

या कारणांमुळे वाढले ग्रामीण भागात रुग्ण

* जिल्हा सिमालगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे लगतच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली, सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणे आता अंगलट आलेले आहे.

* ग्रामीण आरोग्य विभागाद्वारा कंटेनमेंट झोन तयार करणे, हाऊस टू हाऊस सर्व्हे करणे, चाचण्यांची संख्या वाढविणे याची अंांमलबजावणी पुरेशी झालेली नाही.

* साधा ताप समजून त्याकडे दुलर्क्ष करणे, चाचण्या कमी होणे, फिजिकल डिस्टन्सचा वापर न करणे, अंांगावर दुखणे काढणे व अनेकांच्या संर्पकात येणे

पाईंटर

१ ते ३१ मार्च दरम्यान टेस्स्टींग : ९४,२१२

पॉझिटिव्ह : १२,८१७

उपचारानंतर बरे : १५,००५

कोरोनामुक्तचा दर : ११७.०७

पॉझिटिव्हिटीचा दर : १३.६०

१५ एप्रिल ते ४ मे दरम्यान टेस्टींग : ७०,९१७

पॉझिटिव्ह : १५,०३०

उपचारानंतर बरे : ९,३८१

कोरोनामुक्तचा दर : ६२.४१ टक्के

जिल्ह्याच पॉझिटिव्हिटीचा दर : २१.१९ टक्के