शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

संचारबंदीच्या काळात वाढले १५ हजार पॉझिटिव्ह, रोजच्या चाचण्यानंतरही रुग्ण कमी होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:13 IST

जिल्ह्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केली. यावेळी जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५४,४९७ होती, त्यानंतर ३० तारखेला संचारबंदी संपल्यानंतर ...

जिल्ह्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केली. यावेळी जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५४,४९७ होती, त्यानंतर ३० तारखेला संचारबंदी संपल्यानंतर पुन्हा १५ दिवसांसाठी मुदत वाढविण्यात आलेली आहे. सध्या या २० दिवसांत म्हणजेच ४ एप्रिलपर्यत जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तामची संख्या ६९,५२७ वर पोहोचली आहे. म्हणजेच १५ हजारांवर रुग्ण या काळात नोंद झालेले आहे.

तसे पाहता जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली व याला अटकाव करण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्रीला संचारबंदी लागू करण्यात होती. मात्र, यानंतर संसर्ग वाढताच असल्याने पुन्हा १५ दिवसां दोन टप्प्यात संचारबंदी वाढविण्यात आलेली आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. या काळात जीवनावश्यकशिवाय अन्य दुकाने बंद आहेत. त्यामुळे सुपरस्प्रेडरला आता अटकाव झालेला झालेला सकाळी ७ ते ११ या दरम्यानच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा आहे. तरीही संसर्ग वाढताच असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत ३,०५,४७८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. चाचण्यांसाठी युवकांसह ज्येष्ठाची मोठी गर्दी होत आहे. मात्र, लसीचा पुरवठा नसल्याने लोकांना परत जावे लागत आहे.

बॉक्स

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढतीच

१) जिल्ह्यात तसे पाहता मार्च महिन्यापासूनच संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मात्र, पुरेसी अंमलबजावणी होत नसल्याने रस्त्यांवर गर्दी दिसून येते. फिजिकल डिस्टनचा वापर कुठेही होताना दिसत नाही.

२) दंडात्मक कारवाया आता कमी झालेल्या दिसत आहे. ग्रामिणमध्ये यंत्रणाद्वारा पुरेशी अंमलबजावणी होताना दिसत नाही. जिल्हा व आंतर राज्य प्रवासावरची बंदी कुचकामी आहे.

३) कॉन्टक्ट ट्रेसींग कुठेच होताना दिसत नाही, त्यामुळे चाचण्यांमध्ये कमी आलेली आहे. नागरिक अंगावर लक्षणे काढत असल्याने संसर्गासोबतच आता मृत्त्यूदरात वाढ झालेली दिसत आहे.

बॉक्स

या कारणांमुळे वाढले ग्रामीण भागात रुग्ण

* जिल्हा सिमालगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे लगतच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली, सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणे आता अंगलट आलेले आहे.

* ग्रामीण आरोग्य विभागाद्वारा कंटेनमेंट झोन तयार करणे, हाऊस टू हाऊस सर्व्हे करणे, चाचण्यांची संख्या वाढविणे याची अंांमलबजावणी पुरेशी झालेली नाही.

* साधा ताप समजून त्याकडे दुलर्क्ष करणे, चाचण्या कमी होणे, फिजिकल डिस्टन्सचा वापर न करणे, अंांगावर दुखणे काढणे व अनेकांच्या संर्पकात येणे

पाईंटर

१ ते ३१ मार्च दरम्यान टेस्स्टींग : ९४,२१२

पॉझिटिव्ह : १२,८१७

उपचारानंतर बरे : १५,००५

कोरोनामुक्तचा दर : ११७.०७

पॉझिटिव्हिटीचा दर : १३.६०

१५ एप्रिल ते ४ मे दरम्यान टेस्टींग : ७०,९१७

पॉझिटिव्ह : १५,०३०

उपचारानंतर बरे : ९,३८१

कोरोनामुक्तचा दर : ६२.४१ टक्के

जिल्ह्याच पॉझिटिव्हिटीचा दर : २१.१९ टक्के