शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
2
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
5
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
6
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
7
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
8
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
9
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
10
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
11
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
12
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
13
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
16
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
17
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
18
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
20
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

शेतकऱ्यांना १५० कोटी तर, कंपनीला ७०० कोटी दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

अमरावती : खरे तर जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून मंत्री, आमदारांनी लढणे योग्य नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. मात्र, बॅंकेच्या ...

अमरावती : खरे तर जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून मंत्री, आमदारांनी लढणे योग्य नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. मात्र, बॅंकेच्या अध्यक्षांनी १५० कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना तर, ७०० कोटी रुपये दलालांमार्फत कंपनीला दिले आहेत. बॅंकेत झालेला गैरव्यवहार निखंदून काढणे आणि शेतकऱ्यांचे लचके तोडणाऱ्यांना त्यांची

जागा दाखविण्यासाठी ही निवडणूक लढवित असल्याची ग्वाही राज्यमंत्री तथा संचालकपदाचे उमेदवार बच्चू कडू यांनी दिली.

जिल्हा बॅंक ही गाव, खेड्यात पोहोचली आहे. मात्र, चुकीच्या लोकांच्या हाती बॅंकेचा कारभार गेल्याने ही बॅंक आता शेतकऱ्यांनी नव्हे तर कंपनी, दलालांची झाली आहे. निवडणुकीत मदत न करणाऱ्या ६५ सोसायट्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांनी अवसायनात काढल्या, असा आराेप ना. कडू यांनी केला. बॅंकेचा अध्यक्ष हा बेकायदेशीर सावकार असेल, यापेक्षा शेतकऱ्यांचे दुर्दैव असू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. बॅकेने कर्ज द्यावे, यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहे. एमपीए ५२ टक्क्यावर गेला. बॅंकेचा घोटाळा, अपहार हा संचालकांनीच बाहेर काढला. बॅंकेच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांचे लचके तोडले, असा आरोप ना. कडू यांनी केला. संचालकांची बैठक पाच मिनिटात आटोपत असेल, तर कारभार कसा सुरू आहे, हे दिसून येते. ही निवडणूक शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. शेतकऱ्यांना कर्ज वाटप नाही, शेतकरी उपोषण आणि दलालांमार्फत कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढली, असा ठपका अधिकाऱ्यांनी ऑडिटमध्ये ठेवल्याचे ना. बच्चू कडू सांगितले.

--------------------

दोषींची आता सुटका नाही : प्रताप अडसड

जिल्हा बॅंकेत अपहार, घोटाळा झाला, हे आता कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक संचालकपदासाठी नव्हे तर शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. सत्ताधाऱ्यांनी ११ वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे लचके तोडले आहेत. ३.४९ कोटी ही अपहाराची रक्कम फार लहान आहे. बॅंकेत मोठा अपहार झाला असून, आता दोषींची सुटका नाही, असा दावा आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे. माझ्या पत्रानंतर बॅंकेत चौकशी, ईडी, ऑडिट सुरू झाले. ५ ते ७ कोटींचे सॉफ्टवेअरचे घबाड असल्याचा आरोप आमदार अडसड यांनी केला.

---------------------

बंटी, बबलीचे कारस्थान उघड करू: हर्षवर्धन देशमुख

जिल्हा बॅंकेची निवडणूक ही बंटी, बबलीचे कारस्थान थांबविण्यासाठी लढविली जात आहे. बॅंकेचा व्यवहार हा शेतकऱ्यांसाठी चालावा, यासाठी ही लढाई आहे. आता भ्रष्टाचाराचा डंख शिट्टी वाजवून थांबविणार असल्याचे श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले. ही लढाई भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.