शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

शेतकऱ्यांना १५० कोटी तर, कंपनीला ७०० कोटी दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

अमरावती : खरे तर जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून मंत्री, आमदारांनी लढणे योग्य नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. मात्र, बॅंकेच्या ...

अमरावती : खरे तर जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून मंत्री, आमदारांनी लढणे योग्य नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. मात्र, बॅंकेच्या अध्यक्षांनी १५० कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना तर, ७०० कोटी रुपये दलालांमार्फत कंपनीला दिले आहेत. बॅंकेत झालेला गैरव्यवहार निखंदून काढणे आणि शेतकऱ्यांचे लचके तोडणाऱ्यांना त्यांची

जागा दाखविण्यासाठी ही निवडणूक लढवित असल्याची ग्वाही राज्यमंत्री तथा संचालकपदाचे उमेदवार बच्चू कडू यांनी दिली.

जिल्हा बॅंक ही गाव, खेड्यात पोहोचली आहे. मात्र, चुकीच्या लोकांच्या हाती बॅंकेचा कारभार गेल्याने ही बॅंक आता शेतकऱ्यांनी नव्हे तर कंपनी, दलालांची झाली आहे. निवडणुकीत मदत न करणाऱ्या ६५ सोसायट्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांनी अवसायनात काढल्या, असा आराेप ना. कडू यांनी केला. बॅंकेचा अध्यक्ष हा बेकायदेशीर सावकार असेल, यापेक्षा शेतकऱ्यांचे दुर्दैव असू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. बॅकेने कर्ज द्यावे, यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहे. एमपीए ५२ टक्क्यावर गेला. बॅंकेचा घोटाळा, अपहार हा संचालकांनीच बाहेर काढला. बॅंकेच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांचे लचके तोडले, असा आरोप ना. कडू यांनी केला. संचालकांची बैठक पाच मिनिटात आटोपत असेल, तर कारभार कसा सुरू आहे, हे दिसून येते. ही निवडणूक शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. शेतकऱ्यांना कर्ज वाटप नाही, शेतकरी उपोषण आणि दलालांमार्फत कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढली, असा ठपका अधिकाऱ्यांनी ऑडिटमध्ये ठेवल्याचे ना. बच्चू कडू सांगितले.

--------------------

दोषींची आता सुटका नाही : प्रताप अडसड

जिल्हा बॅंकेत अपहार, घोटाळा झाला, हे आता कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक संचालकपदासाठी नव्हे तर शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. सत्ताधाऱ्यांनी ११ वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे लचके तोडले आहेत. ३.४९ कोटी ही अपहाराची रक्कम फार लहान आहे. बॅंकेत मोठा अपहार झाला असून, आता दोषींची सुटका नाही, असा दावा आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे. माझ्या पत्रानंतर बॅंकेत चौकशी, ईडी, ऑडिट सुरू झाले. ५ ते ७ कोटींचे सॉफ्टवेअरचे घबाड असल्याचा आरोप आमदार अडसड यांनी केला.

---------------------

बंटी, बबलीचे कारस्थान उघड करू: हर्षवर्धन देशमुख

जिल्हा बॅंकेची निवडणूक ही बंटी, बबलीचे कारस्थान थांबविण्यासाठी लढविली जात आहे. बॅंकेचा व्यवहार हा शेतकऱ्यांसाठी चालावा, यासाठी ही लढाई आहे. आता भ्रष्टाचाराचा डंख शिट्टी वाजवून थांबविणार असल्याचे श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले. ही लढाई भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.