शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

शेतकऱ्यांना १५० कोटी तर, कंपनीला ७०० कोटी दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

अमरावती : खरे तर जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून मंत्री, आमदारांनी लढणे योग्य नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. मात्र, बॅंकेच्या ...

अमरावती : खरे तर जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून मंत्री, आमदारांनी लढणे योग्य नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. मात्र, बॅंकेच्या अध्यक्षांनी १५० कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना तर, ७०० कोटी रुपये दलालांमार्फत कंपनीला दिले आहेत. बॅंकेत झालेला गैरव्यवहार निखंदून काढणे आणि शेतकऱ्यांचे लचके तोडणाऱ्यांना त्यांची

जागा दाखविण्यासाठी ही निवडणूक लढवित असल्याची ग्वाही राज्यमंत्री तथा संचालकपदाचे उमेदवार बच्चू कडू यांनी दिली.

जिल्हा बॅंक ही गाव, खेड्यात पोहोचली आहे. मात्र, चुकीच्या लोकांच्या हाती बॅंकेचा कारभार गेल्याने ही बॅंक आता शेतकऱ्यांनी नव्हे तर कंपनी, दलालांची झाली आहे. निवडणुकीत मदत न करणाऱ्या ६५ सोसायट्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांनी अवसायनात काढल्या, असा आराेप ना. कडू यांनी केला. बॅंकेचा अध्यक्ष हा बेकायदेशीर सावकार असेल, यापेक्षा शेतकऱ्यांचे दुर्दैव असू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. बॅकेने कर्ज द्यावे, यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहे. एमपीए ५२ टक्क्यावर गेला. बॅंकेचा घोटाळा, अपहार हा संचालकांनीच बाहेर काढला. बॅंकेच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांचे लचके तोडले, असा आरोप ना. कडू यांनी केला. संचालकांची बैठक पाच मिनिटात आटोपत असेल, तर कारभार कसा सुरू आहे, हे दिसून येते. ही निवडणूक शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. शेतकऱ्यांना कर्ज वाटप नाही, शेतकरी उपोषण आणि दलालांमार्फत कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढली, असा ठपका अधिकाऱ्यांनी ऑडिटमध्ये ठेवल्याचे ना. बच्चू कडू सांगितले.

--------------------

दोषींची आता सुटका नाही : प्रताप अडसड

जिल्हा बॅंकेत अपहार, घोटाळा झाला, हे आता कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक संचालकपदासाठी नव्हे तर शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. सत्ताधाऱ्यांनी ११ वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे लचके तोडले आहेत. ३.४९ कोटी ही अपहाराची रक्कम फार लहान आहे. बॅंकेत मोठा अपहार झाला असून, आता दोषींची सुटका नाही, असा दावा आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे. माझ्या पत्रानंतर बॅंकेत चौकशी, ईडी, ऑडिट सुरू झाले. ५ ते ७ कोटींचे सॉफ्टवेअरचे घबाड असल्याचा आरोप आमदार अडसड यांनी केला.

---------------------

बंटी, बबलीचे कारस्थान उघड करू: हर्षवर्धन देशमुख

जिल्हा बॅंकेची निवडणूक ही बंटी, बबलीचे कारस्थान थांबविण्यासाठी लढविली जात आहे. बॅंकेचा व्यवहार हा शेतकऱ्यांसाठी चालावा, यासाठी ही लढाई आहे. आता भ्रष्टाचाराचा डंख शिट्टी वाजवून थांबविणार असल्याचे श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले. ही लढाई भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.