शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
5
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
6
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
7
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
8
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
9
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
11
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
12
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
13
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
14
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
15
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
17
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
18
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
19
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
20
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

शेतकऱ्यांना १५० कोटी तर, कंपनीला ७०० कोटी दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

अमरावती : खरे तर जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून मंत्री, आमदारांनी लढणे योग्य नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. मात्र, बॅंकेच्या ...

अमरावती : खरे तर जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून मंत्री, आमदारांनी लढणे योग्य नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. मात्र, बॅंकेच्या अध्यक्षांनी १५० कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना तर, ७०० कोटी रुपये दलालांमार्फत कंपनीला दिले आहेत. बॅंकेत झालेला गैरव्यवहार निखंदून काढणे आणि शेतकऱ्यांचे लचके तोडणाऱ्यांना त्यांची

जागा दाखविण्यासाठी ही निवडणूक लढवित असल्याची ग्वाही राज्यमंत्री तथा संचालकपदाचे उमेदवार बच्चू कडू यांनी दिली.

जिल्हा बॅंक ही गाव, खेड्यात पोहोचली आहे. मात्र, चुकीच्या लोकांच्या हाती बॅंकेचा कारभार गेल्याने ही बॅंक आता शेतकऱ्यांनी नव्हे तर कंपनी, दलालांची झाली आहे. निवडणुकीत मदत न करणाऱ्या ६५ सोसायट्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांनी अवसायनात काढल्या, असा आराेप ना. कडू यांनी केला. बॅंकेचा अध्यक्ष हा बेकायदेशीर सावकार असेल, यापेक्षा शेतकऱ्यांचे दुर्दैव असू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. बॅकेने कर्ज द्यावे, यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहे. एमपीए ५२ टक्क्यावर गेला. बॅंकेचा घोटाळा, अपहार हा संचालकांनीच बाहेर काढला. बॅंकेच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांचे लचके तोडले, असा आरोप ना. कडू यांनी केला. संचालकांची बैठक पाच मिनिटात आटोपत असेल, तर कारभार कसा सुरू आहे, हे दिसून येते. ही निवडणूक शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. शेतकऱ्यांना कर्ज वाटप नाही, शेतकरी उपोषण आणि दलालांमार्फत कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढली, असा ठपका अधिकाऱ्यांनी ऑडिटमध्ये ठेवल्याचे ना. बच्चू कडू सांगितले.

--------------------

दोषींची आता सुटका नाही : प्रताप अडसड

जिल्हा बॅंकेत अपहार, घोटाळा झाला, हे आता कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक संचालकपदासाठी नव्हे तर शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. सत्ताधाऱ्यांनी ११ वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे लचके तोडले आहेत. ३.४९ कोटी ही अपहाराची रक्कम फार लहान आहे. बॅंकेत मोठा अपहार झाला असून, आता दोषींची सुटका नाही, असा दावा आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे. माझ्या पत्रानंतर बॅंकेत चौकशी, ईडी, ऑडिट सुरू झाले. ५ ते ७ कोटींचे सॉफ्टवेअरचे घबाड असल्याचा आरोप आमदार अडसड यांनी केला.

---------------------

बंटी, बबलीचे कारस्थान उघड करू: हर्षवर्धन देशमुख

जिल्हा बॅंकेची निवडणूक ही बंटी, बबलीचे कारस्थान थांबविण्यासाठी लढविली जात आहे. बॅंकेचा व्यवहार हा शेतकऱ्यांसाठी चालावा, यासाठी ही लढाई आहे. आता भ्रष्टाचाराचा डंख शिट्टी वाजवून थांबविणार असल्याचे श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले. ही लढाई भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.