शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

१५ वर्षांत २३० शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: December 19, 2015 00:14 IST

वरुड तालुक्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. १५ वर्षांत २३० शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपविली.

वरुड तालुक्यात दुष्काळाचे सावट : १६ महिला शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा संजय खासबागे वरुडवरुड तालुक्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. १५ वर्षांत २३० शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपविली. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. सततचा दुष्काळ आणि नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मुलांच्या पालणपोषणासह शिक्षण आणि विवाहाच्या जबाबदाऱ्या डोक्यावर आहेत तर बँका, सावकार आणि खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीचा तगादयाने त्रस्त होऊन अनेकांनी जीवनयात्रा संपविली. सन २००१ पासून तालुक्यात कर्जबाजारीपणा आणि उत्पादन हाती न आल्याने आर्थिक परिस्थिती ढासळल्याच्या कारणाने आत्महत्या केली. यामध्ये तालुक्यातील हातुर्णा, सांवगा, टेंभूरखेडा, अमडापूर, आमनेर, आलोडा, इत्तमगाव, उदापूर, उराड, एकदरा, करजगाव, काचुर्णा, काटी, कुंभीखेडा, कुरळी, खडका, खानापूर, गाडेगाव, घोराड, चांदस, चिंचरगव्हाण, जरुड, जामगाव (खडका), टेंभूरखेडा, ढगा, तिवसाघाट, धनोडी, नांदगाव, नागझिरी, पंढरी, पळसोना, पवनी, पांढरघाटी, पिंपळखुटा, पुसला, पेठ मांगरुळी, फत्तेपूर, बहादा, बेनोडा, बेसखेडा, भापकी, भेमडी, मलकापूर, मांगोना, मिलनपूर, मुसळखेडा, मोरचूंद, मोर्शीखुर्द, रवाळा, बारगांव, आलोडा, खडका, राजुराबाजार, लिंगा, लोणी, खानापूर, वंडली, वडाळा, वरुड, वाठोडा, वाडेगाव, वावरुळी, वेडापूर, शेंदूरजनाघाट, सांवगा, सुरळी, सावंगी येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आणि विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे चित्र आहे. १ जानेवारी २००१ ते १५ डिसेंबर २०१५ पर्यंत तब्बल २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. अतिवृष्टी, गारपीट आणि नंतर कोरडा दुष्काळ याला शेतकरी कंटाळला होता. दुबार , तिबार पेरणी करूनही निसर्गाने साथ दिली नाही. उत्पादनात कमालीची घट झाली. उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्च काढणेही दुरापास्त झाले. दुष्काळी परिस्थितीमध्ये तालुक्यात अतिवृष्टी, गारपिटीने पिके बुडाली. संत्रा बहर गळाला, मृग नक्षत्रामध्ये मृगाच्या पावसाने तब्बल दोन महिने दडी मारल्याने खरीप पेरणी लांबली. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला. केवळ शेतीवर कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलामुलींचे विवाह, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला. बँकांकडून घेतलेल्या कृषी कर्जाचा भरणा कसा करावा, सावकारांचे कर्ज कसे फेडायचे की, गहाणातील जमिनी सावकारालाच पचू द्यायच्या हा प्रश्न निर्माण झाला. शासनाने आदेश देऊनही कर्जाचे पुनर्गठन होत नसल्याने शेतकऱ्यांनी मरण जवळ केले. आता या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भविष्याचा प्रश्न कायम आहे. शासनाने या निदान या शेतकरी कुटुंबातील सदस्यांसाठी तरी आर्थिक मदतीची तरतूद करावी, अशी अपेक्षा आहे.