शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांत २३० शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: December 19, 2015 00:14 IST

वरुड तालुक्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. १५ वर्षांत २३० शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपविली.

वरुड तालुक्यात दुष्काळाचे सावट : १६ महिला शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा संजय खासबागे वरुडवरुड तालुक्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. १५ वर्षांत २३० शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपविली. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. सततचा दुष्काळ आणि नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मुलांच्या पालणपोषणासह शिक्षण आणि विवाहाच्या जबाबदाऱ्या डोक्यावर आहेत तर बँका, सावकार आणि खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीचा तगादयाने त्रस्त होऊन अनेकांनी जीवनयात्रा संपविली. सन २००१ पासून तालुक्यात कर्जबाजारीपणा आणि उत्पादन हाती न आल्याने आर्थिक परिस्थिती ढासळल्याच्या कारणाने आत्महत्या केली. यामध्ये तालुक्यातील हातुर्णा, सांवगा, टेंभूरखेडा, अमडापूर, आमनेर, आलोडा, इत्तमगाव, उदापूर, उराड, एकदरा, करजगाव, काचुर्णा, काटी, कुंभीखेडा, कुरळी, खडका, खानापूर, गाडेगाव, घोराड, चांदस, चिंचरगव्हाण, जरुड, जामगाव (खडका), टेंभूरखेडा, ढगा, तिवसाघाट, धनोडी, नांदगाव, नागझिरी, पंढरी, पळसोना, पवनी, पांढरघाटी, पिंपळखुटा, पुसला, पेठ मांगरुळी, फत्तेपूर, बहादा, बेनोडा, बेसखेडा, भापकी, भेमडी, मलकापूर, मांगोना, मिलनपूर, मुसळखेडा, मोरचूंद, मोर्शीखुर्द, रवाळा, बारगांव, आलोडा, खडका, राजुराबाजार, लिंगा, लोणी, खानापूर, वंडली, वडाळा, वरुड, वाठोडा, वाडेगाव, वावरुळी, वेडापूर, शेंदूरजनाघाट, सांवगा, सुरळी, सावंगी येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आणि विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे चित्र आहे. १ जानेवारी २००१ ते १५ डिसेंबर २०१५ पर्यंत तब्बल २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. अतिवृष्टी, गारपीट आणि नंतर कोरडा दुष्काळ याला शेतकरी कंटाळला होता. दुबार , तिबार पेरणी करूनही निसर्गाने साथ दिली नाही. उत्पादनात कमालीची घट झाली. उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्च काढणेही दुरापास्त झाले. दुष्काळी परिस्थितीमध्ये तालुक्यात अतिवृष्टी, गारपिटीने पिके बुडाली. संत्रा बहर गळाला, मृग नक्षत्रामध्ये मृगाच्या पावसाने तब्बल दोन महिने दडी मारल्याने खरीप पेरणी लांबली. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला. केवळ शेतीवर कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलामुलींचे विवाह, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला. बँकांकडून घेतलेल्या कृषी कर्जाचा भरणा कसा करावा, सावकारांचे कर्ज कसे फेडायचे की, गहाणातील जमिनी सावकारालाच पचू द्यायच्या हा प्रश्न निर्माण झाला. शासनाने आदेश देऊनही कर्जाचे पुनर्गठन होत नसल्याने शेतकऱ्यांनी मरण जवळ केले. आता या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भविष्याचा प्रश्न कायम आहे. शासनाने या निदान या शेतकरी कुटुंबातील सदस्यांसाठी तरी आर्थिक मदतीची तरतूद करावी, अशी अपेक्षा आहे.