शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
2
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
3
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
4
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
5
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
6
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
7
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
8
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
9
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
10
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
11
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
12
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
13
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
14
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
15
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
16
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
17
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
18
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
19
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
20
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

१५ वर्षांत २३० शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: December 19, 2015 00:14 IST

वरुड तालुक्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. १५ वर्षांत २३० शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपविली.

वरुड तालुक्यात दुष्काळाचे सावट : १६ महिला शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा संजय खासबागे वरुडवरुड तालुक्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. १५ वर्षांत २३० शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपविली. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. सततचा दुष्काळ आणि नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मुलांच्या पालणपोषणासह शिक्षण आणि विवाहाच्या जबाबदाऱ्या डोक्यावर आहेत तर बँका, सावकार आणि खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीचा तगादयाने त्रस्त होऊन अनेकांनी जीवनयात्रा संपविली. सन २००१ पासून तालुक्यात कर्जबाजारीपणा आणि उत्पादन हाती न आल्याने आर्थिक परिस्थिती ढासळल्याच्या कारणाने आत्महत्या केली. यामध्ये तालुक्यातील हातुर्णा, सांवगा, टेंभूरखेडा, अमडापूर, आमनेर, आलोडा, इत्तमगाव, उदापूर, उराड, एकदरा, करजगाव, काचुर्णा, काटी, कुंभीखेडा, कुरळी, खडका, खानापूर, गाडेगाव, घोराड, चांदस, चिंचरगव्हाण, जरुड, जामगाव (खडका), टेंभूरखेडा, ढगा, तिवसाघाट, धनोडी, नांदगाव, नागझिरी, पंढरी, पळसोना, पवनी, पांढरघाटी, पिंपळखुटा, पुसला, पेठ मांगरुळी, फत्तेपूर, बहादा, बेनोडा, बेसखेडा, भापकी, भेमडी, मलकापूर, मांगोना, मिलनपूर, मुसळखेडा, मोरचूंद, मोर्शीखुर्द, रवाळा, बारगांव, आलोडा, खडका, राजुराबाजार, लिंगा, लोणी, खानापूर, वंडली, वडाळा, वरुड, वाठोडा, वाडेगाव, वावरुळी, वेडापूर, शेंदूरजनाघाट, सांवगा, सुरळी, सावंगी येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आणि विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे चित्र आहे. १ जानेवारी २००१ ते १५ डिसेंबर २०१५ पर्यंत तब्बल २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यामध्ये १६ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. अतिवृष्टी, गारपीट आणि नंतर कोरडा दुष्काळ याला शेतकरी कंटाळला होता. दुबार , तिबार पेरणी करूनही निसर्गाने साथ दिली नाही. उत्पादनात कमालीची घट झाली. उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्च काढणेही दुरापास्त झाले. दुष्काळी परिस्थितीमध्ये तालुक्यात अतिवृष्टी, गारपिटीने पिके बुडाली. संत्रा बहर गळाला, मृग नक्षत्रामध्ये मृगाच्या पावसाने तब्बल दोन महिने दडी मारल्याने खरीप पेरणी लांबली. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला. केवळ शेतीवर कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलामुलींचे विवाह, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला. बँकांकडून घेतलेल्या कृषी कर्जाचा भरणा कसा करावा, सावकारांचे कर्ज कसे फेडायचे की, गहाणातील जमिनी सावकारालाच पचू द्यायच्या हा प्रश्न निर्माण झाला. शासनाने आदेश देऊनही कर्जाचे पुनर्गठन होत नसल्याने शेतकऱ्यांनी मरण जवळ केले. आता या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भविष्याचा प्रश्न कायम आहे. शासनाने या निदान या शेतकरी कुटुंबातील सदस्यांसाठी तरी आर्थिक मदतीची तरतूद करावी, अशी अपेक्षा आहे.