शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार प्रयोगशाळा कर्मचारी न्यायापासून वंचित

By admin | Updated: November 28, 2015 01:21 IST

सुधारित आकृतिबंध अहवालातील त्रुटी दूर करून अहवालात प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी समन्वय समितीने अहवाल तयार केला आहे.

अमरावतीत रविवारी विचारमंथन : राज्यातील पदाधिकाऱ्यांची राहणार उपस्थितीधामणगाव रेल्वे : सुधारित आकृतिबंध अहवालातील त्रुटी दूर करून अहवालात प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी समन्वय समितीने अहवाल तयार केला आहे. या अहवालाची अंमलबजावणी शासनाने अद्यापही केली नसल्यामुळे कधी न्याय मिळणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे़ दरम्यान, अमरावती येथे राज्यातील या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची विचारमंथन होणार आहे़गत शासनाने २३ आॅक्टोबर २०१३ रोजी अध्यादेश काढून राज्यातील १५ हजार प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविले आहे़ इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत ० ते ३०० पर्यंत एक प्रयोगशाळा परिचर असावा, ३०१ पासून प्रयोगशाळा सहायकपद असावे़ राज्यातील हे कर्मचारी तृतीय श्रेणीत मोडत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त ठरवू नये, ज्युनिअर विभागाला तीन विभागात दोन प्रयोगशाळा सहायक व एक प्रयोगशाळा परिचरांची गरज आहे़ चिपळूनकर व गोगटे समिती यांचा अहवाल विचारात घेऊन प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे आॅनलाईन वेतन देण्यात यावे, अशी मागणी आहे़ मागील अनेक वर्षापासून राज्यातील प्रयोगशाळा कर्मचारी इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावत असताना समितीतील काही सदस्यांना शासन पाठीशी घालून तब्बल १५ हजार कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहे़या कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ शासन कधी न्याय देणार, असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे़ समन्वय समितीच्या बैठकीत राज्याचे शिक्षण आयुक्त हे अध्यक्ष आहेत तर या समितीत १२ सदस्य आहेत. या समितीच्या बैठकीला उपस्थित न राहता केवळ प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्काच्या मागणीला विरोध करणे चुकीचे आहे़ प्रयोगशाळा कर्मचारी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, लिपीक यांना या सुधारित अहवालातून न्याय मिळणे गरजेचे आहे़ राज्य शासनाने त्वरित आपला अहवाल सादर करून प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव भरत जगताप यांनी केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)