शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी १५ पथके

By admin | Updated: June 8, 2017 00:09 IST

बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, ...

मृग नक्षत्रास सुरूवात : बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावी काळजीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, यासाठी यंदा तालुकास्तरावर १४ व जिल्हास्तरावर एक असे एकूण १५ भरारी पथके स्थापन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरुन या पथकावर नियंत्रण ठेवले जात असल्याची माहीती कृषी विभागाने दिली.गुरुवारपासून मृग नक्षत्रास सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात सात लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात खरीपाची पेरणी होणार आहे. यासाठी किमान एक लाख ४० हजार ९८९ क्विंटल बियाणे लागणार आहे. यंदा बियाण्यांची टंचाई नसली तरी दरवर्षीप्रमाणे बोगस बियाणे कंपन्याचा शिरकाव पेरणीच्या काळात होतो. हे हेरून कृषी विभाग कामाला लागला आहे. त्याअनुषंगाने कृषी केंद्रधारकांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. बियाण्यांचा काळाबाजार अथवा अप्रमाणीत बियाणे, एमआरपीपेक्षा जास्त किंमतीत विक्री झाल्याचे निर्दशनात आल्यास त्या दुकानाचा परवाना तत्काळ निलंबित करावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधीकारी उदय काथोडे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना बियाण्यांविषयी शंका आल्यास किंवा दुकानदार अधिक दराने विक्री करीत असल्यास १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सोयाबीनसाठी तीन लाख २३ हजार ३०० हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. एक लाख २१हजार ५०० व्किंटल बियाणे लागणार आहे. एक लाख ९४ हजार हेक्टर सुधारीत व संकरीत कपासीचे क्षेत्र राहणार आहे. पाच हजार ८०० क्विंटल बियाणे लागणार आहे. यंदाच्या हंगामासाठी एक लाख लाख ४० हजार ९८९ व्किंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये ६८ हजार ८४९ व्किंटल खासगी, ७२ हजार १४० सार्वजनिकरित्या उपलब्ध होणार आहे. तर ७६ हजार ४० व्किंटल बियाणे महाबीजव्दारा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.टॅग,लेबल पाहूनच करावी बियाण्यांची खरेदीबियाण्यांच्या पिशवीवरील टॅग बघुनच बियाणे खरेदी करावे. या टॅग वरील लॉट नंबरवरून त्या बियांण्याची विक्री करणारे राज्य कोणते, याची माहीती मिळते. त्यामुळे फसवणूक टाळता येते. लेबल नसलेल्या बियाण्यांचे पाकीट खरेदी केल्यास फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.