शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

१४ हजार जन्मदाखले संशयित ! एसडीओंच्या समितीद्वारे होणार पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:03 IST

Amravati : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश यंत्रणा लागली कामाला

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जन्म आणि मृत्यू सुधारणा अधिनियम २०२३ अंतर्गत जिल्हाभरात आलेले १४३६७ दाखले संशयित ठरले आहे. या सर्व प्रमाणपत्रांची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची एकसदस्यीय समिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आता गठित केली आहे. या समितीद्वारे बोगस कागदपत्रांच्या आधारे देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचा पर्दाफाश होणार आहे.

जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आठ नागरिकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळविल्याने त्यांच्याविरुद्ध १२ फेब्रुवारीला एफआयआर नोंदविण्यात आला व त्यानंतर आता १७ फेब्रुवारीला सहा नागरिकांविरुद्ध अमरावतीच्या गाडगेनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याने गंभिरता वाढली आहे.बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना काही तहसीलदारांद्वारे बनावट जन्म प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आल्याची तक्रार राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे झालेली आहे व याबाबत शासनाचे चौकशीचे पत्र प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी यांनी पहिले अंजनगाव सुर्जी येथे चार सदस्यीय समिती व त्यानंतर सातही उपविभागात एसडीओंच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती गठित केलेली आहे.

समितीद्वारे कामकाज सुरू करण्यात आले असून या सर्व प्रकरणात अर्जदारांनी जोडलेली शैक्षणिक कागदपत्रे (टीसी) पडताळणीचे काम शिक्षण विभागाद्वारे सुरू आहे. तर गावचौकशी अहवाल महसूलची यंत्रणा करीत आहे. यामध्ये सदोष प्रकरणात एफआयआर दाखल होतील. शिवाय प्रकरण कोणत्या तालुक्यातील नायब तहसीलदार व तहसीलदारांवर शेकणार, याची खमंग चर्चा जिल्ह्यात होत आहे. अन्य तालुक्यातही काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तहसीलदार प्राधिकृत, स्वाक्षरी नायब तहसीलदारांची

  • जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी १३ ऑक्टोबर २०१३ रोजी सुधारणा अधिनियमाद्वारे आदेश जारी करुन जिल्ह्यातील सर्व म्हणजे १४ तहसीलदार यांना जन्म किंवा मृत्यू प्रकरणातील कार्यवाहीसाठी प्राधिकृत केले होते. या प्राधिकृत अधिकाऱ्यांना त्यांचे प्राधिकृत अधिकार अधिनस्त म्हणजेच कनिष्ठ अधिकाऱ्यांना देता येत नाही. मात्र, अनेक तालुक्यात चक्क नायब तहसीलदारांना अधिकार दिल्याने घोळ झाल्याचा आरोप होत आहे.
  • बहुतेक तालुक्यांमध्ये दाखल बहुतेक प्रकरणांमध्ये गावनमुन्यांची तपासणीच प्रटाधिकृत अधिकाऱ्यांद्वारा झालेली नसल्याची बाब आता समोर आलेली आहे. अर्जदार ज्या भागातील रहिवाशी आहे. त्या भागातीळ वर्तमानपत्रात जाहीरनामा प्रसिद्ध न करता स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्याने प्रकरणे चर्चेत आलेली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

४४९३ अर्ज एकट्या अमरावती तालुक्यात प्राप्त आहेवर्षभरात जन्म दाखल्यांसाठी १४,४११ अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणातील कागदपत्रांच्या पडताळणीचे आव्हान आहे.

काय आहे २०२३ चा सुधारणा अधिनियम?जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) अधिनियम २०२३ अन्वये कलम १३ (३) मध्ये कोणताही जन्म किंवा मृत्यू याची माहिती निबंधकाला ती घडल्याचे एक वर्षानंतर दिली जाते, त्या जन्म किंवा मृत्यूची नोंद जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा जिल्हादंडाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील जन्म किंवा मृत्यूच्या अचूकतेबाबत तपासणी करेल व शुल्काचा भरणा केल्यानंतर प्राधिकृत केलेला कार्यकारी दंडाधिकारी यांनी तसे आदेश दिल्यानंतरच जन्म किंवा मृत्यूची नोंद करता येते. यासाठी सर्व तहसीदारांना प्राधिकृत करण्यात आले.

"जन्म व मृत्यू दाखल्यांच्या तपासणीसाठी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक एसडीओ यांची एकसदस्यीय समिती गठित केली आहे. समितीचे कामकाज सुरू झालेले आहे."- अनिल भटकर, निवासी उपजिल्हाधिकारी.

टॅग्स :Amravatiअमरावती