शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 22:05 IST

अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे.

ठळक मुद्देआमसभा : प्रवीण पोटेंसह सहकारी पतसंस्था पदाधिकाºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. पूर्वीच्या काळात गाई-म्हशीच्या दूध उत्पादनातून शेतकरी कुटुंबातील महिला पैशांची बचत करीत होत्या. ऐन अडचणीच्या वेळेस हा बचत केलेला पैसा कामी येत असे. कालांतराने शिक्षणासाठी व रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी लोक शहराकडे स्थलांतरित होऊ लागले. सततची नापिकी व निर्सगाचा लहरीपणा यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला. सर्व अडचणींवर मात करण्यासाठी शेतकºयांनी पूर्वीप्रमाणेच शेतीपूरक व्यवसाय करून आत्मनिर्भर व्हावे, असे संवेदनशील आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी केले.महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी अभियंता सहकारी पतसंस्था मर्या. अमरावती या संस्थेची ३१ वी वार्षिक आमसभा पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी या पतसंस्थेव्दारे जिल्ह्यातील १४ आत्महत्याग्रस्त शेतकºयांंच्या कुटुंबीयांना १० हजार रुपये मदतीचा धनादेश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सुनील जगताप, महावितरण यवतमाळचे अधीक्षक अभियंता रामेश्वर माहुरे, महावितरण अमरावतीचे अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता प्रफुल्ल औघड, वाशिमचे अधीक्षक अभियंता कैशरीया, आम्ही सारे फॉउंडेशनचे शेतकरी नेते विजय विल्हेकर सर्व सदस्य उपस्थित होते.राज्य शासनाकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. यावर्षी कर्जमाफी योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाला १० हजारांची तातडीची मदत आणि दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येत आहे. शेतकºयांनी खचून न जाता इतर शेतीपूरक व्यवसाय करून आर्थिक सुबत्ता प्राप्त करावी. शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून गाई-म्हशीचे पालन करावे, असे ते म्हणाले.महावितरणच्या अभियंतांनी आत्महत्याग्रस्त व गोर-गरीब कुंटुंबातील तीन विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च भागवावा. होतकरु विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच व दोन गणवेशाचे जोड उपलब्ध करून दिल्यास आयुष्यात आपणसुध्दा समाजिक दायित्व पूर्ण केल्याची भावना निर्माण होईल, असे पोटे म्हणाले. समारंभात १० वी, १२ वी मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या अभियंतांच्या पाल्यांचा व वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळालेल्या अभियंतांचे तसेच सेवानिवृत्त अभियंतांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र ठाकरे यांनी पतसंस्थेचा लेखाजोखा वाचून दाखविला. कार्यक्रमाचे संचालन उज्वल गावंडे यांनी केले, तर आभार मोघे यांनी मानले.