शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

१४ गाई, चार बकऱ्यांचा तलावात बुडून मृत्यू

By admin | Updated: May 30, 2017 00:16 IST

नजीकच्या सावंगा येथील जंगलात चराईसाठी गेलेल्या १४ गाई, चार बकऱ्यांचा रविवारी सायंकाळी वादळी पावसात अडकल्याने मृत्यू झाला.

सावंगा येथील घटना : वादळी पावसाचा तडाखा लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/लोणी : नजीकच्या सावंगा येथील जंगलात चराईसाठी गेलेल्या १४ गाई, चार बकऱ्यांचा रविवारी सायंकाळी वादळी पावसात अडकल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी सावंगा येथे घडली. चराईनंतर ही जनावरे परत येत होत्या. याचवेळी काल सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान महादेवखोरी प्रकल्पावर पाणी पिण्यास गेल्या, तेव्हा वादळी पाऊस आल्याने जनावरे सैरभैर झाली. सर्व जनावरे हवेच्या प्रवाहाने सरळ तलावातील पाण्यात शिरली. यातील १४ गायी, ४ बकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर उर्वरित जनावरांना मच्छीमारांनी वाचविले.प्राप्त माहितीनुसार, वरूड तालुक्यातील सावंगा येथील गुराखीने जंगलात जनावरे चराईकरिता नेले होते. २८ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजतादरम्यान परतीच्या वेळी ४० ते ४५ गाई, बकऱ्या पाणी पिण्याकरिता प्रकल्पात गेल्या. तलावातील पाण्यात शिरल्याने यातील १४ गायी, ४ बकऱ्या पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्या, तर येथे उपस्थित शरद उपसा योजनेचा कर्मचारी राऊत आणि मच्छीमारांनी तलावात बोटी टाकून १५ ते २० जनावरे वाचविण्यात यश मिळविले. या घटनेत अंदाजे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. तहसीलदार आशिष बिजवल यांना माहिती मिळताच तहसीलदार बिजवल, तलाठी खरात, नायब तहसीलदार देशमुख, सहारे यांच्यासह आपत्ती निवारण समितीचे पथक घटनास्थळावर पोहोचले, तर सोमवारी पशुवैद्यकीय अधिकारी सावरकर यांनी मृत जनावरांचा पंचनामा व शवविच्छेदन करून अहवाल तयार करुन महसूल विभागाला सादर केला आहे.