शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

१३व्या वित्त आयोगाची डेडलाईन संपली

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

तेरावा वित्त आयोग राज्य शासनाने सन २०१० पासून जिल्हा परिषदेला लागू केला होता.

ब्रेक : अखर्चित निधी होणार शासनदरबारी जमाजितेंद्र दखने अमरावतीतेरावा वित्त आयोग राज्य शासनाने सन २०१० पासून जिल्हा परिषदेला लागू केला होता. आता या आयोगाची पाच वर्षांची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे अखर्चित निधी शासन दरबारी जमा केला जाणार आहे. १ जानेवारीपासून चौदावा केंद्रीय वित्त आयोग सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी अस्तित्वात येत आहे. त्यामुळे प्रशासनावर वरील दोन्ही वित्त आयोगाच्या प्रशासकीय कामाचा ताण वाढला आहे. १३ व्या वित्त आयोगात शिल्लक असलेली रक्कम खर्च करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्याचबरोबर या निधीतूनच संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) योजनेचे पैसे देण्याचेही निर्देश दिले आहेत.१३ व्या वित्त आयोगाचा मिळणारा निधी ७० टक्के ग्रामपंचायत २० टक्के जिल्हा परिषद, १० टक्के पंचायत समिती स्तरावर खर्च करण्याचे निर्देश होते. याप्रमाणे जिल्हा परिषद प्रशासनाने तेराव्या वित्त आयोगातून विविध विकासकामे सन २०१० ते २०१५ अखेरपर्यंत केली आहे. यामधून जिल्ह्यात काही ठिकाणी कामे सुरू आहेत, काही कामे आटोपली आहेत. मात्र आतापर्यंत १३ व्या वित्त आयोगातून डिसेंबरपर्यंत एकूण खर्चातील जे रक्कम या कालावधीत खर्च केली नसल्यास तो निधी शासन दरबारी जमा केला जाईल. डिसेंबर महिन्यात या निधीमधील ३ कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च होण्याचे बाकी होते. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या आत हा निधी खर्च करण्याच्या हालचाली वाढल्या होत्या. मात्र अशा परिस्थितीत तेराव्या वित्त आयोगातील निधी खर्च न झाल्यास हा निधी शासन दरबारी जमा होऊ शकतो. मुदतवाढीची शक्यताअमरावती : या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे हा निधी कुठल्याही परिस्थिती परत जाणार नाही, याची खबरदारी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. यामुळे निधी परत जाणार नाही, याची शाश्वती आहे. १३व्या वित्त आयोगाला शासनाने सलग दोन वेळा मुदतवाढ दिली.