शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

१३व्या वित्त आयोगाची डेडलाईन संपली

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

तेरावा वित्त आयोग राज्य शासनाने सन २०१० पासून जिल्हा परिषदेला लागू केला होता.

ब्रेक : अखर्चित निधी होणार शासनदरबारी जमाजितेंद्र दखने अमरावतीतेरावा वित्त आयोग राज्य शासनाने सन २०१० पासून जिल्हा परिषदेला लागू केला होता. आता या आयोगाची पाच वर्षांची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे अखर्चित निधी शासन दरबारी जमा केला जाणार आहे. १ जानेवारीपासून चौदावा केंद्रीय वित्त आयोग सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी अस्तित्वात येत आहे. त्यामुळे प्रशासनावर वरील दोन्ही वित्त आयोगाच्या प्रशासकीय कामाचा ताण वाढला आहे. १३ व्या वित्त आयोगात शिल्लक असलेली रक्कम खर्च करण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्याचबरोबर या निधीतूनच संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र) योजनेचे पैसे देण्याचेही निर्देश दिले आहेत.१३ व्या वित्त आयोगाचा मिळणारा निधी ७० टक्के ग्रामपंचायत २० टक्के जिल्हा परिषद, १० टक्के पंचायत समिती स्तरावर खर्च करण्याचे निर्देश होते. याप्रमाणे जिल्हा परिषद प्रशासनाने तेराव्या वित्त आयोगातून विविध विकासकामे सन २०१० ते २०१५ अखेरपर्यंत केली आहे. यामधून जिल्ह्यात काही ठिकाणी कामे सुरू आहेत, काही कामे आटोपली आहेत. मात्र आतापर्यंत १३ व्या वित्त आयोगातून डिसेंबरपर्यंत एकूण खर्चातील जे रक्कम या कालावधीत खर्च केली नसल्यास तो निधी शासन दरबारी जमा केला जाईल. डिसेंबर महिन्यात या निधीमधील ३ कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च होण्याचे बाकी होते. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या आत हा निधी खर्च करण्याच्या हालचाली वाढल्या होत्या. मात्र अशा परिस्थितीत तेराव्या वित्त आयोगातील निधी खर्च न झाल्यास हा निधी शासन दरबारी जमा होऊ शकतो. मुदतवाढीची शक्यताअमरावती : या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे हा निधी कुठल्याही परिस्थिती परत जाणार नाही, याची खबरदारी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. यामुळे निधी परत जाणार नाही, याची शाश्वती आहे. १३व्या वित्त आयोगाला शासनाने सलग दोन वेळा मुदतवाढ दिली.