शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

१,३४३ कोटींचे कर्जवाटप रखडले

By admin | Updated: June 23, 2017 00:03 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची शासनघोषणा बँकांच्या पथ्यावर पडली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल

खरिपाला सुरूवात : १६ टक्क्यांवरच स्थिरावल्या बँकालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची शासनघोषणा बँकांच्या पथ्यावर पडली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल कोणतेच सोयरेसुतक नसलेल्या बॅँकांनी यंदाचा खरीप सुरू झाला असताना सुद्धा कर्जवाटपाचा टक्का वाढविलेला नाही. जिल्ह्यात अद्याप १,३४३ कोटी ७६ लाखांचे कर्जवाटप बाकी आहे. सद्यस्थितीत कर्जवाटपाचा किमान ४० ते ५० टक्का अपेक्षित असताना फक्त १६ टक्केच कर्जवाटप झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी दर आठवड्यात बँकांची बैठक घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील हे गांभीर्याने घेतले नसल्यामुळे शेतकऱ्यांवर बँकांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे.यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यातील बँकांना १,५९२ कोटी ८० लाखांचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा बँकेला ५१६ कोटी ६० लाखांचा लक्ष्यांक असताना आतापर्यंत १७ हजार ९०१ शेतकऱ्यांना १६७ कोटी ३६ लाखांचे वाटप केले आहे. कर्जवाटपाची ही टक्केवारी ३२ टक्के इतकी आहे. राष्ट्रीयीकृत बँकाना १०६२ कोटी ६ लाखांचा लक्ष्यांक असताना आतापर्यंत सात हजार ९८० शेतकऱ्यांना ७९ कोटी ८० लाखांचे वाटप केले आहे. कर्जवाटपाची ही टक्केवारी केवळ ८ टक्के आहे. तर ग्रामीण बँकांना १३ कोटी ८८ लाखांचा लक्ष्यांक असताना १९३ शेतकऱ्यांना एक कोटी ६२ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. ही टक्केवारी १२ टक्के इतकी आहे.शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व संपानंतर गावागावात उद्रेक झाला. त्यानंतर सुकाणू समिती व शेतकरी प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेनंतर शासनाने शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली. १२०० कोटींनी होणार बँका मालामालमहसूलमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार जिल्ह्यात एक लाख ८२ हजार १७२ शेतकऱ्यांचे थकबाकी असलेले एक लाख मर्यादेतील ११९३ कोटी १७ लाख कोटींचे कर्ज माफ होणार आहे. यामध्ये जिल्हा बँकेला २१९ कोटी ८६ लाख, व्यावसायिक बँकांना ९७२ कोटी ४६ लाख व ग्रामीण बँकाना ८५ लाख रूपये मिळण्याची शक्यता आहे. यामुळे बँका मालामाल होणार आहेत.१० हजारांचे तात्पुरते कर्जवाटपही नाहीजिल्ह्यासह राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर निविष्ठांसाठी मदत व्हावी म्हणून १० हजार रूपयांचे तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय ३० जून रोजी शासनाने घेतला व सर्व बँकांना तसे निर्देश दिलेत. मात्र, जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याला हे तातडीचे कर्ज मिळाले नाही. अकोला जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज देत असताना अमरावती जिल्हा बँकेने मात्र हात वर केल्याचे चित्र आहे.