शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आढळली १३१ मुले शाळाबाह्य

By admin | Updated: February 6, 2016 00:22 IST

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दुसऱ्यांदा केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात अमरावती जिल्ह्यात १३१ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत.

सर्वेक्षण : दुसऱ्या टप्प्यात आकडा घटला, सर्वेक्षणावर संशयअमरावती : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दुसऱ्यांदा केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात अमरावती जिल्ह्यात १३१ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. राज्यात ४ जुलै २०१५ रोजी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण झाले होते आणि त्यामध्ये सर्वत्र ५५ हजार मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले होते. ही आकडेवारी कमी असल्याचा दावा करीत स्वयंसेवी संस्थांनी फेर सर्वेक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार १५ ते ३१ जानेवारी दरम्यान दुसरे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मागच्या तुलनेत आकडेवारीत घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता फक्त राज्यभरात अकरा हजारच मुलेच शाळाबाह्य राहिल्याचा दावा करण्यात येत आहे. शासनाने २ फेब्रुवारी रोजी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार अमरावती विभागगात ५८८ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात मेळघाटातील धारणी व चिखलदरा या आदिवासीबहुल क्षेत्रासह इतर १२ तालुके मिळून केवळ १३१ शाबाह्य मुले शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात दुसऱ्या टप्प्यात आढळून आले आहे. या सर्वेक्षणासाठी शिक्षण विभागाने शिक्षक व कर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली होती. विविध बस्त्या, झोपडपट्टी, अशा विविध ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. विभागात सर्वात जास्त अकोला जिल्ह्यात २९५ तर सर्वात कमी यवतमाळ जिल्ह्यात शाळाबाह्य मुले आढळलीत. त्यानंतर अमरावतीत १३१, बुलडाणा ३५ आणि वाशिम जिल्ह्यात ९५ मुले सर्वेक्षणात शाळाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले.