सर्वेक्षण : दुसऱ्या टप्प्यात आकडा घटला, सर्वेक्षणावर संशयअमरावती : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दुसऱ्यांदा केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात अमरावती जिल्ह्यात १३१ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. राज्यात ४ जुलै २०१५ रोजी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण झाले होते आणि त्यामध्ये सर्वत्र ५५ हजार मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले होते. ही आकडेवारी कमी असल्याचा दावा करीत स्वयंसेवी संस्थांनी फेर सर्वेक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार १५ ते ३१ जानेवारी दरम्यान दुसरे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मागच्या तुलनेत आकडेवारीत घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता फक्त राज्यभरात अकरा हजारच मुलेच शाळाबाह्य राहिल्याचा दावा करण्यात येत आहे. शासनाने २ फेब्रुवारी रोजी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार अमरावती विभागगात ५८८ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात मेळघाटातील धारणी व चिखलदरा या आदिवासीबहुल क्षेत्रासह इतर १२ तालुके मिळून केवळ १३१ शाबाह्य मुले शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात दुसऱ्या टप्प्यात आढळून आले आहे. या सर्वेक्षणासाठी शिक्षण विभागाने शिक्षक व कर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली होती. विविध बस्त्या, झोपडपट्टी, अशा विविध ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. विभागात सर्वात जास्त अकोला जिल्ह्यात २९५ तर सर्वात कमी यवतमाळ जिल्ह्यात शाळाबाह्य मुले आढळलीत. त्यानंतर अमरावतीत १३१, बुलडाणा ३५ आणि वाशिम जिल्ह्यात ९५ मुले सर्वेक्षणात शाळाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यात आढळली १३१ मुले शाळाबाह्य
By admin | Updated: February 6, 2016 00:22 IST