शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेच्या कचाट्यातून पाणीटंचाईची १३ कोटींची कामे मुक्त

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 7, 2024 23:44 IST

जिल्हाधिकाऱ्यांद्वारा प्रशासकीय मान्यता : कामे पूर्ण करण्यास १५ जून ‘डेडलाइन’.

अमरावती : जिल्ह्यात १६ मार्चपासून आचारसंहिता लागू झाल्याने पाणीटंचाईची कामे रखडली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते, तसेच विभागीय आयुक्तांनीही शासनाला ४ एप्रिल रोजी पत्र दिले होते. त्या अनुषंगाने शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे पत्र ३० एप्रिल रोजी प्राप्त झालेेले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिलेली कित्येक कामे आता करता येणार आहे.

अटी पूर्ततेच्या अधीन राहून ही कामे कोणत्याही परिस्थितीत १५ जूनच्या आत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या अनुषंगाने नळ पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती व तात्पुरत्या पूरक योजनेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता आचारसंहितेपूर्वी देण्यात आल्या व ३१ मे पूर्वी कामे पूर्ण करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे. मात्र, निविदा प्रक्रियेच्या काळात १६ मार्चपासून आचारसंहिता लागू झाल्याने पाणीटंचाईची कामे कशी करावीत, याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा जिल्हाधिकाऱ्यांना २६ मार्चच्या पत्रान्वये मार्गदर्शन मागण्यात आले होते.

तात्पुरत्या पूरक नळ योजना व नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची कामांचे प्रस्ताव योग्य शिफारशीसह शासनाकडे विशेष बाब म्हणूण मंजुरीसाठी पाठवाव्यात व अशा प्रस्तावांना १५ एप्रिलनंतर मंजुरी देण्यात येणार नसल्याच्या स्पष्ट सूचना आहेत. मात्र, कमी पावसामुळे उद्भवलेली गंभीर पाणीटंचाई लक्षात घेता या कामांना आता शासनाद्वारा मान्यता देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.----------------------३० लाखांपर्यंत प्र.मा.चे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाविशेष नळयोजना दुरुस्तीकरिता ३० लाख व तात्पुरती पूरक नळ योजना दुरुस्तीकरिता २० लाखांपर्यंत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना शासनाद्वारे प्रदान करण्यात आलेले आहेत. शिवाय ग्रामीण भागातील पाणीटंचाई अंतर्गत लोकवर्गणीची अट यापूर्वीच शासनाने काढून टाकलेली आहे.---------------------या आहेत कामासंदर्भातील अटी१) प्रस्तावित उपाययोजना कृषी आराखड्यातील आहेत. यावर्षी पूर्ण होऊन लोकांच्या उपयोगात येतील. शिवाय पाण्याचे टँकर, विहीर अधिग्रहण किंवा अन्य उपाययोजनांपेक्षा कमी खर्चात होईल, याची खात्री जिल्हाधिकारी स्तरावरून करावी.२) संपूर्ण पाइपलाइन बदलविण्यापेक्षा नादुरुस्त भाग तेवढाच बदलविण्यात यावा. योजनेच्या खर्चात वाढ झाल्यास शासन जबाबदार राहणार नाही. कामांसाठी सात दिवसांची ई-निविदा काढावी, आदी अटी आहेत. 

टॅग्स :Amravatiअमरावती