शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

१३ कोटींचे स्वच्छता कंत्राट ३० कोटींत कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:37 IST

शहरातील दैनंदिन स्वच्छतेवर १३ ते १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना एकल कंत्राटाची किंमत ३० कोटी कशी, असा सवाल करत आ. रवि राणा यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.

ठळक मुद्देआ. राणा यांची विचारणा : प्रशासन अन् सत्ताधीशांचे वाभाडे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील दैनंदिन स्वच्छतेवर १३ ते १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना एकल कंत्राटाची किंमत ३० कोटी कशी, असा सवाल करत आ. रवि राणा यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. महापालिका आयुक्तांच्या दालनाशेजारी असलेल्या सभागृहात मॅरेथॉन बैठक घेऊन आ.राणा यांनी विविध प्रलंबित विषयांना हात घातला.बहुतांश उत्तरे सकारात्मक न आल्याने राणा यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी विविध अधिकाºयांचा क्लास घेऊन प्रशासकीय लेटलतिफी सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला. यावेळी महापालिकेच्या विधी सभापती सुमती ढोके, नगरसेविका सपना ठाकूर, आशिष गावंडे यांच्यासह युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या कालावधीनंतर राणा यांनी महापालिकेत बैठक घेतल्याने तब्बल १८ विषयांवर घणाघाती चर्चा झाली. महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असताना स्वच्छतेवर ३० कोटी रुपये खर्च करणे प्रशासनाला परवडेल काय? अन्य दायित्वाचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. ते खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, मोकाट श्वानांचा प्रादुर्भाव रोखावा, डेंग्यू मलेरियाचा प्रकोप तातडीने रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही सूचना त्यांनी केली. महापालिकेच्या विविध रुग्णालयात औषधींचा अल्प साठा, रमाई घरकूल योजना, पंतप्रधान आवास योजना, राजापेठ ओव्हरब्रिज, भीमटेकडी सौंदर्यीकरण, रिलायंस कंपनीकडून झालेले खोदकाम, आॅटो डीसीआर प्रणाली, भुयारी गटार योजना, शहरातील अनधिकृत फलकबाजी, नेताजी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा, ग्रीन स्पेस, अकोली बायपास, छत्री तलावाचे सौंदर्यीकरण आदी मुद्द्यांवर आ. राणा यांनी महापालिका आयुक्तांकडून माहिती घेतली. तसेच रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची सूचना केली. बैठकीला महापालिका अधिकाºयांसह एसटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ व अन्य विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.राणांच्या निवेदनात 'बीव्हीजी'चे नावस्वच्छतेच्या एकल कंत्राटासाठी १३ नोव्हेंबरला निविदा प्रक्रिया करण्यात आली. ही प्रक्रिया ११ डिसेंबरला संपुष्टात येऊन त्यानंतर पात्र निविदाधारक कंपनीचे नाव उघड होईल. मात्र आ.राणा यांनी मंगळवारी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात 'बीव्हीजी' या कंपनीचे नाव उघडपणे घेण्यात आले आहे. स्थायी समिती सभापती तुषार भारतीय याच कंपनीला समोर ठेवून एकल कंत्राट करीत असल्याचा आरोप करण्यात आला.सत्ताधीशांवर कोरडेअमरावती महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली तरी प्रलंबित विषयांची संख्या अधिक आहे. महापालिकेत श्रेयाची लढाई सुरू असून तुषार भारतीय यांनी दावा केलेले १३६ कोटी रुपये कोठे आहेत, अशी विचारणा आ.राणा यांनी केली. तीन तास चाललेल्या मॅराथॉन बैठकीत त्यांनी प्रशासनासह भाजपवरही कोरडे ओढले.