शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यूपीतील १२०० व्यक्ती लखनौकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:01 IST

पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते. गुजरातेत बडोदा येथे ट्रेन सोडण्याबाबत नियोजन होत आहे. अडकलेल्या सर्व नागरिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

ठळक मुद्देस्वगृही परतण्याचा आनंद : पालकमंत्र्यासह खासदारांनी दाखविली झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या १२३९ व्यक्तींना स्वगृही पोहचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस शनिवारी सायंकाळी येथील रेल्वे स्थानकावरून लखनौकडे रवाना झाली. जिल्ह्यात अडकलेल्या इतरही नागरिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. संयम ठेवा, कुणीही पायी जाऊ नका, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते. गुजरातेत बडोदा येथे ट्रेन सोडण्याबाबत नियोजन होत आहे. अडकलेल्या सर्व नागरिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. रेल्वे स्थानकावर सर्व प्रवाशांंची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी योगदान दिले. प्रवाशांच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद दिसत होता. शासनाने दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली याबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. ट्रेन सुटताच प्रवाशांनी एकच जल्लोष केला.जिल्ह्यातून आतापर्यंत उत्तर प्रदेशात ३८६, भोपाळ ४, बिलासपूर ६९, तेलंगणा ४१४, आंध्र प्रदेश १६८, राजस्थान १५३, मध्य प्रदेश ३७६, चेन्नई ५, पश्चिम बंगाल येथील १५ व्यक्ती विशेष ट्रेनद्वारे रवाना झाल्या. कोटा येथून ७२ विद्यार्थ्यांना जिल्ह्यात परत आणण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.संकेतस्थळावर नोंदणीद्वारे जिल्ह्यात परतणे शक्यजिल्ह्यातून इतर राज्यात गेलेल्या या सर्व व्यक्तींना परत अमरावती जिल्ह्यात यावयाचे असल्यास त्यांना शासनाने विहित केलेल्या लिंकवर व संकेत स्थळावर आॅनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्यांना तेथील जिल्हा प्रशासनाद्वारा येण्याची परवानगी दिली जाईल. जिल्ह्यात परत येणाºया व्यक्तींची तालुका समितीमार्फत आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात व राज्यात परतलेल्या व्यक्तींसाठीदेखील हीच पद्धत राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या