शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१२ रेशन दुकाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:38 IST

अचलपूर येथील तहसीलदारांनी केलेल्या तपासणीत तालुक्यातील १२ रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीनचा वापर न करता, धान्यवाटप केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. रेशनचे हे धान्य कार्डधारक लाभार्थींना देण्यात आले किंवा नाही, याची तपासणी सुरू केल्याने काळाबाजार करणाऱ्या भ्रष्ट रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देअनियमितता भोवली : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर येथील तहसीलदारांनी केलेल्या तपासणीत तालुक्यातील १२ रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीनचा वापर न करता, धान्यवाटप केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. रेशनचे हे धान्य कार्डधारक लाभार्थींना देण्यात आले किंवा नाही, याची तपासणी सुरू केल्याने काळाबाजार करणाऱ्या भ्रष्ट रेशन दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.शासनाच्या नवीन आदेशानुसार सर्व रेशन धान्य दुकानाचे कामकाज आॅनलाइन करण्यात आले आहे. कुटुंबप्रमुखाच्या बोटांच्या ठशांच्या आधारे रेशन दुकानातून धान्य घेतल्याची खात्री केली जाते. त्यानंतर संबंधित कार्डधारकाला रेशनचे धान्य दिले जाते. स्वस्त धान्य दुकानांमध्ये दुकानदार गोरगरिबांचे धान्य खुल्या बाजारात विकून भ्रष्टाचार करीत असल्याच्या शेकडो तक्रारीनंतर शासनाने आॅनलाइन मशीनचा वापर सुरू केला आहे.१०० टक्के आॅनलाइन थम्ब मशीनचा वापर करण्याचे आदेश असताना, तालुक्यातील सुमारे १२ दुकानदारांनी ५० टक्क््यांपेक्षा कमी प्रमाणात वापर केला असल्याचा ठपका निलंबित करण्यात आलेल्या रेशन धन्य दुकानदारांवर ठेवण्यात आला आहे.यांची झालीत दुकाने निलंबितअचलपूर तालुक्यातील असदपूर येथील सेवा सहकारी सोसायटी, परतवाडा येथील आर.आर. भगत, पांढरी येथील एम.एम. राजने, नरसिंगपूर येथील आर.डी. व्यवहारे, अचलपूरचे एच.ए. शहा, जी.बी. शिरस्कर, देवमाळी येथील एम.पी. शेरेकर आदींची दुकान परवाने निलंबित करण्यात आले.सतत केले आदेशाचे उल्लंघनतहसीलदार निर्भय जैन यांनी २ जून रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविला होता. दुकानदारांना मार्च आणि एप्रिलचे धान्य २६ एप्रिल व २९ मे रोजी पोहोचते केले तरी ५० टक्क्यांपेक्षा कमी धान्य वितरण आढळून आले. जुलै महिन्यातसुद्धा तीच परिस्थिती होती. महाराष्ट्र अनुसूचित वस्तू अधिनियम १९७५ चे कलम १८ (२) अंतर्गत अटीचे उल्लंघन केल्यामुळे कायद्याच्या कलम ३ नुसार पुढील आदेशापर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी कारवाई केली.कार्डधारक अन्य दुकानाला संलग्नकार्डधारकांची गैरसोय टाळण्याकरिता नजीकच्या रेशन दुकानांशी जोडण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले. रेशनचे धान्य कार्डधारकाला दिले गेले किंवा नाही, यासंदर्भात ५० टक्के कार्डधारकांचे बयान घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यात अपहार उघड झाल्यास फौजदारी कारवाईची शक्यता आहे.संबंधित दुकानदारांनी शासननियमानुसार ई-पॉस मशीनचा वापर न करता धान्यवाटप केले. सूचना देऊनसुद्धा अहवाल सादर केला नाही. तसा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाºयांना पाठविल्यावर सात दुकाने निलंबित करण्यात आली आहेत.- निर्भय जैन, तहसीलदार