शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘त्या’ ट्रकवर १२ लाख ५४ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:14 IST

लोकमत इम्पॅक्ट परतवाडा : निर्धारित जागा सोडून पूर्णा नदीच्या पात्रात अवैध रेती चोरी करणाऱ्या पाच ट्रकवर अचलपूर तहसीलदार व ...

लोकमत इम्पॅक्ट

परतवाडा : निर्धारित जागा सोडून पूर्णा नदीच्या पात्रात अवैध रेती चोरी करणाऱ्या पाच ट्रकवर अचलपूर तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी १२ लक्ष ५४ हजार रुपये दंड आकारला असून याविरुद्ध ट्रकचालकांनी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले आहे.

भातकुली तालुक्यातील पोहरा पूर्णा येथील रेती घाटाचा लिलाव करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अचलपूर तालुक्यात अंतर्गत येलकी पूर्णा परिसरातील पूर्णा नदीपात्रात वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केल्याचा प्रकार उघड झाला होता. याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करताच अचलपूर महसूल विभागाने त्यावर पाळत ठेवून पाच ट्रक जप्त केले होते. त्यावर अचलपूर तहसीलदार मदन जाधव यांनी अवैधरित्या गौणखनिज रेती चोरीप्रकरणी प्रत्येकी ५० हजार ८०० रुपये असा २ लक्ष ४ हजार रुपये दंड ठोठावला. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी वाहनांचा हा प्रकार पाहता २ लक्ष रुपये प्रत्येकी दंड असा एकूण पाच ट्रक विरुद्ध १० लक्ष रुपये असा एकूण १२ लक्ष ५४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यासंदर्भात ‘लोकमत’ने वाळू माफिया लाखो रुपयांचा महसूल घशात घालीत असल्याचे वृत्त प्रकाशित केला होते. तर सदर ट्रक विरुद्ध प्रशासनाच्या वतीने कारवाई केल्याचे ‘लोकमत’ ला सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात रक्कम सांगण्यात आली नव्हती. हे विशेष.

बॉक्स

पुढील कारवाई अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे

रेती चोरट्यांच्या पाच ट्रकविरुद्ध कारवाई होताच तस्करांमध्ये खळबळ उडाली होती. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी आकारलेल्या नोटिसा बजावल्या असून याविरोधात ट्रक चालकांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. त्यामुळे या ट्रकवर आकारलेला दंड वसूल होणार की सुटणार हे निर्णय अंतिम औत्सुक्याचे ठरणार आहे.

बॉक्स

अवैध उत्खनावर चाप कुणाचा?

पूर्णा नदीपात्रातून वाटेल तेथे खड्डे करून वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. त्यावर विविध समित्या देखरेखीसाठी असल्या तरी प्रत्यक्षात होणारी कारवाई मात्र नगण्य आहे. शासनाचा महसूल सोबत असताना दुसरीकडे यातून पर्यावरणाचा धोकाही निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णा नदी पात्रातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळणे गरजेचे झाले आहे.