शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कृषिपंपांसाठी मिळणार १२ तास ‘थ्री फेज’ वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 20:45 IST

राज्यात कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये कृषिपंपांसाठी १२ तासांचा ‘थ्री-फेज’ वीजपुरवठा देण्यात येईल. शासनाने गुरूवारी हा निर्णय घेतला आहे. 

अमरावती, दि. 9 -  राज्यात कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये कृषिपंपांसाठी १२ तासांचा ‘थ्री-फेज’ वीजपुरवठा देण्यात येईल. शासनाने गुरूवारी हा निर्णय घेतला आहे. 

पुरेशा पावसाअभावी उभ्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून कृषिपंपांसाठी अतिरिक्त वीजपुरवठा देण्यास शासन विचाराधीन होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा पातळीवर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, भूजल सर्वेक्षण अणि विकास यंत्रणेचे वैज्ञानिक व महावितरण कंपनीचे संबंधित अधीक्षक अभियंत्यांचा समावेश करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अशी एक समिती गठित करण्याचे रीतसर आदेश संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढण्यात येणार आहेत.

 राज्यात यंदाच्या पावसाळ्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस पडला नाही. पावसाअभावी उगवलेली पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुरेशा पावसाअभावी शेतातील उभी पिके नष्ट झाल्यास राज्यात अभुतपूर्व धान्य व चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूण टंचाईची नुकसान भरपाई व अतिरिक्त वीजपुरवठ्याकरिता महावितरण कंपनीला द्यावयाचे अनुदान याची तुलना केल्यास सदर अनुदानापेक्षा अधिकपटीने टंचाईवर खर्च करावा लागेल. त्याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती उदभवणार आहे  त्या ठिकाणी कृषीपंपाकरिता नेहमीच्या ८ ते १० तासांऐवजी १२ तास थ्री फेज वीजपुरवठा करण्यासाठी जिल्हापातळीवर पालकंमत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात येणार आहे.