शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

१२ दिवसांत ८ ते १४ अंशादरम्यान पारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

वातावरण बदलाने जिल्ह्यात शीलहरचा फटका मागच्या आठवड्यात बसला होता. या दरम्यान दोन दिवस तुरळक पावसाची नोंद काही तालुक्यांत झाली, तर मोर्शी व तिवसा तालुक्यात गारपीटही झाली. यामुळे खरिपाच्या कपाशी, तूर व रबीच्या गहू, हरभरा तसेच संत्रा पीक या वातावरण बदलाने बाधित झाले.

ठळक मुद्देहवामानतज्ज्ञ : कमाल तापमानात अंशत: वाढ अपेक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील १२ दिवसांत जिल्ह्याचे तापमान ८ ते १४ अंशाचे दरम्यान राहिले आहे. पुढील ७२ तासात जिल्ह्याचे तापमानात अंशत: वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये कमाल तापमान हे १२ अंशाच्या आसपास राहणार असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.वातावरण बदलाने जिल्ह्यात शीलहरचा फटका मागच्या आठवड्यात बसला होता. या दरम्यान दोन दिवस तुरळक पावसाची नोंद काही तालुक्यांत झाली, तर मोर्शी व तिवसा तालुक्यात गारपीटही झाली. यामुळे खरिपाच्या कपाशी, तूर व रबीच्या गहू, हरभरा तसेच संत्रा पीक या वातावरण बदलाने बाधित झाले. गारपीटने झालेल्या नुकसानाचे दोन दिवसांत सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आहे.शीतलहरीमुळे तूर पिकावर दवाळ गेला. यामुळे झाडे जागीच करपायला लागली आहेत तसेच ‘कोल्डवेव्ह’मुळे तुरीच्या झाडाचे शेंडे व काही ठिकाणी झाडेदेखील वाळायला लागली आहे. जमिनीत आर्द्रता व वातावरणात आर्द्रता तसेच ढगाळ वातावरण यामुळे कपाशीचे बोंडे सडायला लागली आहेत. काही ठिकाणी फुटलेला कापूस बोंडात ओला झालेला आहे. यामुळे कापसाची प्रतवारीदेखील खराब झालेली आहे.संत्र्याच्या आंबिया बहराला ताण बसला नसल्यामुळे येणाऱ्या बहरावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. वातावरण बदलामुळे सर्दी, पडसे, खोकला व ताप यासारख्या आजारांतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नागरिकांनी आजारावर मात केल्यास या हवामानाचा आनंद लुटता येईल.जिल्ह्यातील तापमान स्थिती (अं/से)दिनांक कमाल किमान१ जानेवारी १२.४ २५.६२ जानेवारी १४.१ २०.००३ जानेवारी १४.१ २०.००४ जानेवारी १२.४ २५.००५ जानेवारी ०९.२ २३.००६ जानेवारी १२.४ २६.००७ जानेवारी १३.०० २६.००७ जानेवारी १४.३ २६.००८ जनेवारी १४.३ २६.००९ जनेवारी १४.१ २६.००१० जानेवारी ०९.३ २६.००११ जानेवारी ०९.१ २६.००१२ जानेवारी ०८.२ २६.००

टॅग्स :Natureनिसर्ग