शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

१२ दिवसांत ८ ते १४ अंशादरम्यान पारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

वातावरण बदलाने जिल्ह्यात शीलहरचा फटका मागच्या आठवड्यात बसला होता. या दरम्यान दोन दिवस तुरळक पावसाची नोंद काही तालुक्यांत झाली, तर मोर्शी व तिवसा तालुक्यात गारपीटही झाली. यामुळे खरिपाच्या कपाशी, तूर व रबीच्या गहू, हरभरा तसेच संत्रा पीक या वातावरण बदलाने बाधित झाले.

ठळक मुद्देहवामानतज्ज्ञ : कमाल तापमानात अंशत: वाढ अपेक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील १२ दिवसांत जिल्ह्याचे तापमान ८ ते १४ अंशाचे दरम्यान राहिले आहे. पुढील ७२ तासात जिल्ह्याचे तापमानात अंशत: वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये कमाल तापमान हे १२ अंशाच्या आसपास राहणार असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.वातावरण बदलाने जिल्ह्यात शीलहरचा फटका मागच्या आठवड्यात बसला होता. या दरम्यान दोन दिवस तुरळक पावसाची नोंद काही तालुक्यांत झाली, तर मोर्शी व तिवसा तालुक्यात गारपीटही झाली. यामुळे खरिपाच्या कपाशी, तूर व रबीच्या गहू, हरभरा तसेच संत्रा पीक या वातावरण बदलाने बाधित झाले. गारपीटने झालेल्या नुकसानाचे दोन दिवसांत सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आहे.शीतलहरीमुळे तूर पिकावर दवाळ गेला. यामुळे झाडे जागीच करपायला लागली आहेत तसेच ‘कोल्डवेव्ह’मुळे तुरीच्या झाडाचे शेंडे व काही ठिकाणी झाडेदेखील वाळायला लागली आहे. जमिनीत आर्द्रता व वातावरणात आर्द्रता तसेच ढगाळ वातावरण यामुळे कपाशीचे बोंडे सडायला लागली आहेत. काही ठिकाणी फुटलेला कापूस बोंडात ओला झालेला आहे. यामुळे कापसाची प्रतवारीदेखील खराब झालेली आहे.संत्र्याच्या आंबिया बहराला ताण बसला नसल्यामुळे येणाऱ्या बहरावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. वातावरण बदलामुळे सर्दी, पडसे, खोकला व ताप यासारख्या आजारांतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नागरिकांनी आजारावर मात केल्यास या हवामानाचा आनंद लुटता येईल.जिल्ह्यातील तापमान स्थिती (अं/से)दिनांक कमाल किमान१ जानेवारी १२.४ २५.६२ जानेवारी १४.१ २०.००३ जानेवारी १४.१ २०.००४ जानेवारी १२.४ २५.००५ जानेवारी ०९.२ २३.००६ जानेवारी १२.४ २६.००७ जानेवारी १३.०० २६.००७ जानेवारी १४.३ २६.००८ जनेवारी १४.३ २६.००९ जनेवारी १४.१ २६.००१० जानेवारी ०९.३ २६.००११ जानेवारी ०९.१ २६.००१२ जानेवारी ०८.२ २६.००

टॅग्स :Natureनिसर्ग