शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

कृषी स्वावलंबनसाठी विदर्भाच्या वाट्याला 11.68 कोटी, अनुसूचित जाती शेतक-यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:47 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनाद्वारे आता दीड लाख वार्षिक उत्पन्न असणा-या अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतक-यांना नवीन विहीर, जुन्या विहिरींची दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, शेततळ्यांचे अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच आदी घटकांचा लाभ मिळणार आहे.

अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनाद्वारे आता दीड लाख वार्षिक उत्पन्न असणा-या अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतक-यांना नवीन विहीर, जुन्या विहिरींची दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, शेततळ्यांचे अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच आदी घटकांचा लाभ मिळणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या या योजनेतंर्गत विदर्भाच्या वाट्याला ९० कोटी ४० लाख ३५ हजार आले आहेत. याद्वारे शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न होणार आहे.योजनेमध्ये नवीन विहिरीच्या लाभाकरिता शेतक-याजवळ ०.४० हेक्टर क्षेत्रमर्यादा आवश्यक आहे. नवीन विहीर खोदणे ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबींसाठी किमान ०.२० हेक्टरची मर्यादा आहे तसेच १० अश्व शक्ती क्षमतेपर्यतचे  विद्युतपंप संचाकरीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत असलेले मापदंड लाभार्थ्यांना लागू राहणार आहे. सूक्ष्म सिंचन संचाकरिता ५५  टक्के अनुदान प्रधानमंत्री कृषिसिंचन योजनेतून व ५५ टक्के अनुदान कृषी स्वाबलंबन योजनेतून देण्यात येणार आहे. ठिबक सिंचन संचासाठी १ लाख ५८ हजार ७३० रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यास लाभार्थींना प्रधानमंत्री कृषिसिंचन योजना व कृषी स्वावलंबन योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. तुषार सिंचनासाठी संच बसविण्याचा खर्च ७९ हजार ३६५ रुपयांपेक्षा कमी झाल्यास या दोन्ही योजनांच्या माध्यमातून ९० टक्के अनुदान मिळेल. त्यापेक्षा जास्त झाल्यास प्रधानमंत्री कृषिसिंचन योजनेच्या मापदंडानुसार ५५ टक्के अनुदान देण्यात येईल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून २५ हजारांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने दिली.जिल्हानिहाय मंजूर निधीकृषी स्वावलंबन योजनेसाठी राज्याला २३६ कोटी ५९ लाख रुपये मंजूर करण्यात आलेत. यापैकी विदर्भाच्या वाट्याला ९०.४० कोटी आलेत. यामध्ये अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याला १५.७५ कोटी, अकोला ६०, वाशिम १५.१५, अमरावती ११.६८ व यवतमाळ जिल्ह्यास ८.२६ कोटी मंजूर करण्यात आले. नागपूर विभागात नागपूर जिल्ह्याला ४.४० कोटी, वर्धा ७.१५, भंडारा ६, गोंदीया ६, चंद्रपूर ७ व गडचिरोली जिल्ह्यासाठी  ३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.

टॅग्स :Amravatiअमरावती