आरोग्य प्रशासन सतर्क : एका आठवडयाचा अहवालअमरावती : दूषित पाणी व शिळे अन्न सेवन केल्याने टायफाईडची लागण होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात आठवडाभरात टायफाईडचे ११५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. टायफाईडची साथ पसरण्याची ही चिन्हे असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात दूषित पाणी आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरल्याने विविध आजारांची उत्पत्ती होत आहे. दररोज जिल्हा सामान्य रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार सुरु आहेत. इर्विनमध्ये २३ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ८०६ रुग्ण विविध आजारांवरील उपचारकरिता दाखल झाले. यात सर्वाधिक रुग्ण टायफाईडने बाधित असल्याचे स्पष्ट झाले. ३२३ रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासल्यानंतर ११५ रुग्ण टायफाईड पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी दूषित पाणी, शिळे अन्न व उघड्याावरील अन्न खाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.दूषित पाणी व शिळे अन्न सेवन केल्यास टायफाईडची लागण होते. त्यामुळे पाणी उकळून व थंड करून प्यावे. तसेच शिळे व उघड्यावरील अन्न खाणे टाळावे. - अशोक वणकर,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.
टायफाईडचे ११५ रुग्ण पॉझिटिव्ह
By admin | Updated: March 10, 2015 00:36 IST