शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पश्चिम विदर्भात ११ हजार मे. टन चाऱ्याची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 20:54 IST

अत्यल्प पावसामुळे पश्चिम विदर्भात २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. दुष्काळामुळे वैरणटंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा२५ लाख ३६ हजार पशुधनासाठी वैरण उत्पादनाची तयारी

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अत्यल्प पावसामुळे पश्चिम विदर्भात २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. दुष्काळामुळे वैरणटंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तांच्या माहितीनुसार विभागातील दुष्काळी भागात लहान-मोठी २५ लाख ३६ हजार पशूधन आहेत. या पशूधनाला किमान ११,०२८ मे.टन चाऱ्याची कमी भासणार असल्याने चाºयाची तूट भरून काढायला संबंधित विभागाचे नियोजन सुरू आहे.राज्यातील दुष्काळी गावांत पाणीटंचाईसह वैरणटंचाईची मोठी प्रमाणावर समस्या असल्याने या सर्व ठिकाणी चाºयाचे नियोजन करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या गावातच चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी नियोजन सुरू आहे. यात गाळपेर क्षेत्रात चारा निर्मिती हा पर्याय म्हणून समोर आलेला आहे. प्रकल्पाला कोरड लागल्याने यामधील पाणीसाठा कमी झालेला आहे. या बुडीत क्षेत्रातील जमिनी शेतकऱ्यांना मका, ज्वारी, बाजरी सारखी चारा पिके घ्यायला नाममात्र एक रूपया भाडेपट्टीने शेतकºयांना देण्यात येणार आहे. विभागात ७,३६० हेक्टर गाळपेर क्षेत्रात ६३९ क्विंटल मका, ५१६ क्विंटल ज्वार, ८८ क्विंटल बाजरी व १४ क्विंटल न्यूट्रीफिड बियाण्यांची आवश्यकता आहे. यासाठी विभागात सद्यस्थितीत २,१३५ अर्ज पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झालेले आहेत.राज्यासाठी उपलब्ध १० कोटींमधून विभागात आरकेव्हीवाय योजनेंतर्गत ४५६ क्विंटल मका बियाणे प्राप्त आहेत. यामध्ये ४५,६४५ मे.टन हिरवी वैरण व ज्वारीसाठी ५४२ क्विंटल बियाणे प्राप्त आहेत. यामधून ६०,९९५ मे.टन हिरवे वैरण उपलब्ध होणार आहे. असे एकूण १,०६,६०० मे.टन चाऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. २,२७० हेक्टरमध्ये हे नियोजन आहे. यासाठी १४,४९२ अर्ज प्राप्त झाले असून, यामधून १२,७३९ लाभार्थ्यांची निवड पशुसंवर्धन विभागाने केली आहे.जिल्हानिहाय पशुधन, लागणारा चाराअमरावती जिल्ह्यातील १०,०३,५५५ पशुधनाला प्रतीमाह १,०५,२४२ मे.टन चाºयाची आवशकता आहे. अकोला जिल्ह्यात ४,५२,४८८ पशुधनाला ५२,३६२ मे.टन., बुलडाणा जिल्ह्यात १०,२०,३३७ पशूधनाला १,१४,७४३ मे.टन, वाशीम जिल्ह्यात ४,५७,५२४ पशुधनाला ५३,५१० मे.टन. व यवतमाळ जिल्ह्यातील ११,४०,३३९ पशुधनाला १,४१,२७७ मे. टन चाऱ्याची आवश्यकता आहे.अमरावती, बुलडाण्यात चाऱ्याची तूट* विभागातील दुष्काळी २८ तालुक्यांत २०,३५,७६४ पशुधन आहे. यासाठी जून २०१९ पर्यंत १९,४३,८८७ मे.टन चारा लागेल. मात्र, १९,५४,९१५ मे.टन चारा उपलब्ध होणार असल्याने ११,०२८ मे.टन चाºयाची तूट भासणार आहे. यामध्ये अकोला, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यात चाऱ्याची तूट बासणार नसली तरी अमरावती जिल्ह्यात १,००,५५६ मे.टन. व बुलडाणा जिल्ह्यात १,८३,५३० मे.टन चाऱ्याची तूट भासणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेती