पान २ ची लिड
कॅप्शन : पाईप लाईनसाठी रस्ते खोदून ठेवल्याने अशी दुरवस्था झाली आहे.
१०.३३ कोटींची पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात : दहा महिन्यांपासून कामाचा वेग वाढेना
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : तब्बल ११ हजार ग्रामस्थांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून मंगरूळ दस्तगीर येथे १०. ३३ कोटी रुपये खर्चून जलस्वराज्य पेयजल योजनेचे काम सुरू झाले. मात्र, दहा महिन्यांपासून या योजनेचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने ही पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाणार तरी केव्हा, असा सवाल मंगरूळवासीयांनी उपस्थित केला आहे.
राज्य शासनाने या गावासाठी १० कोटी ३३ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेची अंमलबजावणी, नियोजन, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर सोपविण्यात आली आहे़. अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची झळ सहन करणाºया ११ हजार ग्रामस्थांना त्यातून शुद्ध पिण्याचे पाणी, तेही २४ बाय ७ असे मिळणार होते. या योजनेचे काम एक वर्षापासून सुरू आहे. कोरोनाकाळात २२ मार्च २०२० नंतर या कामावर दोन किंवा तीन मजूर दिसतात. त्यामुळे ही योजना पूर्ण होणार कधी व आम्हाला पाणी मिळणार कधी, असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
रस्त्याची झाली दुर्दशा
पाणीपुरवठा योजनेसाठी गावातील सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे हे गाव त्या खोदकामामुळे भकास झाले आहे. ही योजना जलसंजीवनी ठरणार असताना, जीवन प्राधिकरण अधिकाºयांचे या गंभीर बाबीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे. मंगरूळ दस्तगीर हे गाव परिसरातील दहा ते पंधरा गावांची बाजारपेठ आहे. या गावातील रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने अर्थव्यवस्थेवरदेखील परिणाम झाला आहे.
कोट
रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर करून घेतला. मात्र, अद्यापही जीवन प्राधिकरणाच्या लालफीतशाहीमुळे ही योजना पूर्ण झाली नाही. पाईप लाईन टाकण्यासाठी वारंवार रस्ते खोदले जात आहेत.
सुरेश निमकर, जिल्हा परिषद सदस्य
------