शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

११ हजारांवर उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:35 IST

अमरावती : जिल्ह्यात उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सोमवारी उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानंतर चिन्हवाटपाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू आहे. किमान ...

अमरावती : जिल्ह्यात उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सोमवारी उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानंतर चिन्हवाटपाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू आहे. किमान ७०० वर उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याची शक्यता निवडणूक विभागाने वर्तविली त्यामुळे रिंग्णात ११ हजार ५०० वर उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत १२,५९४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते व उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी १३३ अर्ज बाद झाल्याने १२,४६१ अर्ज शिल्लक राहिले. सोमवारी दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आले व लगेच सर्व पात्र उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आल्याने आता खऱ्याअर्थाने गावागावांतील निवडणुकीत रंगत येणार आहे.

निवडणूक विभागाने सोमवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, अमरावती तालुक्यात ४० ग्रामपंचायतींच्या १५४ प्रभागांत १२९ उमेदवारांनी माघार घेतल्याने ९३० उमेदवार रिंगणात आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यात २९ ग्रामपंचायतीच्या ९३ प्रभागासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये ५० अर्ज माघार घेतल्याने ५१९ उमेदवार रिंगणात आहे. चांदूरबाजार तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीच्या १४० प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. यात ६० अर्जांची माघार घेण्यात आल्याने ८५४ उमेदवार कायम आहेत. वरूड तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींच्या १३९ प्रभागांत ही निवडणूक होत आहे. यात ७१ उमेदवारांनी माघार घेतली, तर धारणी तालुक्यात ३५ ग्रामपंचायतीत ५१ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. वृत्त लिहिस्तोवर चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुरू होती.