शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

११ हजारांवर उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:35 IST

अमरावती : जिल्ह्यात उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सोमवारी उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानंतर चिन्हवाटपाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू आहे. किमान ...

अमरावती : जिल्ह्यात उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सोमवारी उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानंतर चिन्हवाटपाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू आहे. किमान ७०० वर उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याची शक्यता निवडणूक विभागाने वर्तविली त्यामुळे रिंग्णात ११ हजार ५०० वर उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत १२,५९४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते व उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी १३३ अर्ज बाद झाल्याने १२,४६१ अर्ज शिल्लक राहिले. सोमवारी दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आले व लगेच सर्व पात्र उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आल्याने आता खऱ्याअर्थाने गावागावांतील निवडणुकीत रंगत येणार आहे.

निवडणूक विभागाने सोमवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, अमरावती तालुक्यात ४० ग्रामपंचायतींच्या १५४ प्रभागांत १२९ उमेदवारांनी माघार घेतल्याने ९३० उमेदवार रिंगणात आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यात २९ ग्रामपंचायतीच्या ९३ प्रभागासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये ५० अर्ज माघार घेतल्याने ५१९ उमेदवार रिंगणात आहे. चांदूरबाजार तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीच्या १४० प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. यात ६० अर्जांची माघार घेण्यात आल्याने ८५४ उमेदवार कायम आहेत. वरूड तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींच्या १३९ प्रभागांत ही निवडणूक होत आहे. यात ७१ उमेदवारांनी माघार घेतली, तर धारणी तालुक्यात ३५ ग्रामपंचायतीत ५१ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. वृत्त लिहिस्तोवर चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुरू होती.