शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

११ आरागिरण्या नियमबाह्य

By admin | Updated: December 25, 2014 23:23 IST

येथील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सन २००५ पासून तर आजतागायत ११ आरागिरण्यांना नियमबाह्य परवानगी दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या आरागिरण्या राजरोसपणे सुरु आहेत.

उपवनसंरक्षक ांचा प्रताप : सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे गुंडाळलीगणेश वासनिक - अमरावतीयेथील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सन २००५ पासून तर आजतागायत ११ आरागिरण्यांना नियमबाह्य परवानगी दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या आरागिरण्या राजरोसपणे सुरु आहेत. मात्र, परवानगी मिळविण्यासाठी आरागिरणी चालकांनी वनअधिकाऱ्यांना मोठी रक्कम मोजल्याची माहिती आहे.नवीन आरागिरण्यांना परवानगी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे ठरविली आहेत. त्यानुसार अरागिरण्यांचे अंतर राखीव, संरक्षित वनांपासून १० कि.मी. आहे किंवा नाही, हे बघण्यासाठी राज्य शासनाने जवळच्या रस्त्याचे अंतर मोजावे, अशी नियमावली आहे. परंतु २००५ पासून आतापर्यंत आरागिरण्यांना देण्यात आलेल्या परवानगीत मोठा घोळ करण्यात आला आहे. या आरागिरण्यांना परवानगी देताना जवळच्या रस्त्याचे अंतर मोजणे अपेक्षित होते. मात्र, ज्या ११ आरागिरण्यांना परवानगी देण्यात आली त्यापैकी बहुतांश आरागिरण्यांचे अंतर वनसर्वेक्षकांनी मोटरसायकलने मोजून तसा अहवाल उपवनसंरक्षकाना सादर केला. त्यामुळे वनसर्वेक्षकांच्या अहवालाचा दाखला देत गेल्या ९ वर्षात ११ नियमबाह्य आरागिरण्यांना परवानगी देऊन वनांचा ऱ्हास करण्याचे कटकारस्थान वनअधिकाऱ्यांनी रचल्याचे दिसते. यात बहुतांश आरागिरण्या वनपरिक्षेत्रातच असल्याचे स्पष्ट होते. वनांच्या जवळ आरागिरण्या उभारल्या की वाहतुकीचा खर्चही वाचतो. ही बाब हेरुन अवैध वृक्ष तोडीला वाव दिल्याचे चित्र आहे.