शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ११ कोटी मंजूर

By admin | Updated: March 19, 2016 00:10 IST

जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी १० कोटी ६६ लाख ९० हजार रुपयांचा निधी महसूल व पुनर्वसन विभागाच्यावतीने मंजूर करण्यात आला असून ...

पालकमंत्र्यांचे प्रयत्न : ४३ गावांतील ४१२२ घरांच्या बांधकामाला गती अमरावती : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी १० कोटी ६६ लाख ९० हजार रुपयांचा निधी महसूल व पुनर्वसन विभागाच्यावतीने मंजूर करण्यात आला असून तसा शासन निर्णय १७ मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आहे. याबाबत ५ फेब्रवारी २०१६ मध्ये पालकमंत्री पोटे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकरिता महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक घेण्यात आली होती. यावेळी आ.अनिल बोंडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव गोविंदराज, उपसचिव मंदार पोहरे, आडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पूरग्रस्त व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्ह्यातील ५४ गावांतील ५०२० घरांच्या बांधकामाऐवजी ४३ गावांतील ४१२२ घरांच्या पुनर्वसनाला शासनाने अंतिम मान्यता दिली आहे. त्यानुसार घर बांधणीसाठी पहिल्या व दुसऱ्या टप्प्याकरीता एकूण १७ कोटी ७ लक्ष रुपये, नागरी सुविधांकरिता १२ कोटी ४२ लक्ष रुपये आणि वलगाव येथील पुनर्वसनाच्या भूसंपादनासाठी ४ कोटी २० लक्ष रुपये इतक्या निधीची आवश्यकता होती. त्यानुसार १० कोटी रुपयांचा निधी घर बांधकामासाठी वितरित करण्यात आला होता. आता १० कोटी ६६ लाख ९० हजारांचा निधी महसूल व पुनर्वसन विभागाच्यावतीने मंजूर करण्यात आल्याने अमरावती जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या अपूर्ण कामाला गती मिळणार आहे. महसूलमंत्री खडसे यांनी जिल्ह्यातील ४३ गावांतील पुनर्वसनाच्या कामासाठी सर्वतोपरी मदत केल्यामुळे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी शुक्रवारी विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे आभार मानले आहेत.