शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘फिट इंडिया’त जिल्ह्यातील १०९९ शाळा ‘अनफिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST

(असाईमेंट) अमरावती : कोरोनाकाळात सर्वांच्याच शारीरिक क्षमतेचा कस लागला. प्रतिकार क्षमतेअभावी अनेकांचा कोराेनाने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ...

(असाईमेंट)

अमरावती : कोरोनाकाळात सर्वांच्याच शारीरिक क्षमतेचा कस लागला. प्रतिकार क्षमतेअभावी अनेकांचा कोराेनाने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘फिट इंडिया’ मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातून या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद मात्र अत्यंत निराशाजनक आहे. सुमारे २८९३ शाळांपैकी १७९४ शाळांनीच सहभाग नोंदविला. खेळांकडे पाहण्याचा समाजाचा आणि शाळांचा दृष्टिकोन अत्यंत उदासीन असल्याचे यावरून स्पष्ट होते.

जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या २,८९३ शाळा आहेत. सर्वच शाळांनी ‘फिट इंडिया’मध्ये सहभाग घेणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष परिस्थिती मात्र तशी नाही. फेब्रुवारीत मोहीम सुरू झाल्यानंतर क्रीडा व शिक्षण विभागाने तालुकानिहाय बैठका घेतल्या. या योजनेची माहिती देऊन नोंदणी करण्याचे आवाहन केले. अमरावती, तिवसा, अचलपूर, धामणगाव रेल्वे तालुक्यांनी यात रस दाखविला. उर्वरित तालुक्यांतील शाळांनी मात्र नोंदणीकडे पाठ फिरविली. नोंदणीची मुदत २७ डिसेंबरपर्यंतच होती. त्यामुळे नोंदणी करणाऱ्या शाळांनाच याचा लाभ मिळणार आहे. मात्र, या मोहिमेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याचे संकेत क्रीडा क्षेत्रातून मिळत आहेत. संपूर्ण नोंदणी ऑनलाईन स्वरूपात करायची आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला लिंक देण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात नोंदणी सुरू झाली. नेमक्या याच काळात शाळा बंद होत्या. विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांचा संपर्कच राहिला नाही. त्याचाही फटका ‘फिट इंडिया’ला बसला. मुळात या उपक्रमाची सुरुवातच चुकीच्या वेळी झाल्याची प्रतिक्रिया क्रीडा शिक्षकांनी व्यक्त केली.

-----------------------

पहिली ते बारावीपर्यंत शाळा-महाविद्यालये : २८९३

शाळांची नोंदणी: १७९४

शिक्षक: ५४७

---------------------

शारीरिक शिक्षणासाठी शिक्षकच प्रभारी

शाळांमध्ये खेळांविषयी अत्यंत अनास्था असल्याचे ‘फिट इंडिया’ मोहिमेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. क्रीडा साहित्य वर्षानुवर्षे धूळखात पडले आहे. ते मुलांच्या पुढ्यात येतच नाही. सहायक शिक्षकच क्रीडा शिक्षक असतो. त्याच्याकडे खेळ सोडून शाळेतील अन्य सर्व कामे लावली जातात. मूळ विषय बाजूलाच राहतो.

---------------------------

कोरोनामुळे शाळा बंद राहिल्या. त्याचा फटका ‘फिट इंडिया’ मोहिमेला बसला. शाळा व मुलांशी संपर्कच झाला नाही. योजनेचा प्रसारही परिणामकारक होऊ शकला नाही. आता शाळा सुरू होत असल्याने नोंदणी वाढण्याची अपेक्षा आहे. तंदुरुस्त देशासाठी मोहीम महत्त्वाची आहे.

- वामन बोलके, शिक्षणाधिकारी, अमरावती.

---------------------------

लॉकडाऊन काळात ‘फिट इंडिया’साठी पूर्ण नोंदणी शक्य झाली नाही. चार तालुक्यांतून क्रीडा शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन नोंदणीसाठी आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला. अजूनही नोंदणी सुरू आहे. जास्तीत जास्त शाळांच्या सहभागाचे आमचे प्रयत्न

आहेत. - गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी