शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

१०५ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर घमासान

By admin | Updated: June 18, 2014 23:51 IST

भातकुली व अमरावती तालुक्यातील १०५ गावांना विश्रोळी पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत (मजीप्रा) पाणीपुरवठा करण्याचे कार्यान्वित करण्यात आले; मात्र यापैकी काही गावांना तांत्रिक

अमरावती : भातकुली व अमरावती तालुक्यातील १०५ गावांना विश्रोळी पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत (मजीप्रा) पाणीपुरवठा करण्याचे कार्यान्वित करण्यात आले; मात्र यापैकी काही गावांना तांत्रिक कारणामुळे सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने बुधवारी आमदार यशोमती ठाकूर यांनी मजीप्राच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत भातकुली व अमरावती तालुक्यातील १०५ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विश्रोळी पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र, काही गावांना अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. दरम्यान याबाबत योजनेत समाविष्ट गावांतील सरपंच आणि नागरिकांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे तक्रारीसुद्धा केल्यात. तक्रारींची दखल घेत हा मुद्दा त्यांनी अधिवेशनात लावून धरला. त्यामुळे न्पाणीपुरवठा मंत्र्यांनी दखल घेतली आणि हा मुद्दा निकाली काढण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. अखेर या विभागाचे मुख्य अभियंता माधव जवादे, अधीक्षक अभियंता एम. डी. मैढयवार, सहायक अभियंता राजेंद्र गोल्यकर, अधीक्षक अभियंता मेकॅनिक तेजाळे, कार्यकारी अभियंता प्रशांत भामरे, श्र्वेता बॅनर्जी, आदी समस्या निकाली काढण्यासाठी आले होते. या अधिकाऱ्यांनी योजनेचे निरीक्षण केल्यानंतर आ. यशोमती ठाकूर यांनी तक्रार निवारण सभा बोलाविली होती. सभेला विविध गावांतील सरपंच व नागरिकांची उपस्थिती होती. पाणीपुरवठा योजनेतील अडथळे दूर करण्यासोबतच पाणीपुरवठा करणारी पाईप लाईनचे लिकेज दुरुस्त करण्याची मागणी केली. काही गावांतील टाकीत पाणी चढत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले. आमदार ठाकूर यांनी मजीप्राच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून या समस्या तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश दिले. याबाबत एक महिन्यात योजनेचे पुन:सर्व्हेक्षण केले जाईल. पाणीपुरवठा प्रतीव्यक्ती ४० लीटरऐवजी ५५ लीटर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.