शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

पीक विम्याच्या भरपाईसाठी कंपनीकडे १.०५ लाख अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST

अमरावती : पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे २,२२,४१० हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. योजनेच्या नियमानुसार बाधित पिकांसाठी विमा संरक्षित ...

अमरावती : पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे २,२२,४१० हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. योजनेच्या नियमानुसार बाधित पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के प्रमाणात नुकसान भरपाई देय आहे. यासाठी विहित मुदतीत म्हणजेच नुकसान झाल्याचे ७२ तासांच्या आत १,०५,२५६ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना अर्ज विमा कंपनीकडे सादर केले. अद्याप कंपनीद्वारा एकाही शेतकऱ्याला भरपाई देण्यात आलेली नाही.

यंदाच्या खरीप हंगामासाठी विभागातील १२,९९,७०७ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. १०,२८,६३९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केलेले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २.२२ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा कृषी व महसूल विभागाचा अहवाल आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी किमान २५ टक्के भरपाई देय आहे. याकरिता अमरावती जिल्ह्यात १४,७१०, अकोला ४९,७२४, बुलडाणा ८,७६३, वाशिम १२,२५९ व यवतमाळ जिल्ह्यात १९,७७० पूर्वसूचना अर्ज (इंटिमेशन) शासनाने सुचविलेल्या सहा पर्यायाच्या आधारे विमा कंपनीकडे दाखल केले आहे.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे माहितीनुसार आतापर्यंत पीक विमा कंपनीद्वारा ९०,३६२ अर्जाचे अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, यापैकी एकाही शेतकऱ्याला कंपनीद्वारा विमा संरक्षित रक्कम मिळाली नसल्याने कृषी विभाग करतो तरी काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

बॉक्स

नैसर्गिक अपत्तीमुळे ४१ तालुके बाधित

यंदाच्या पावसाळ्यात संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे अमरावती विभागातील ४१ तालुक्यातील ३५१ शहरे व ६,४३५ गावे व यामध्ये १९,९२९ कुटुंबे व ५०,८४१ नागरिक बाधित झालेले आहे. यामध्ये १५,२२२ हेक्टर शेती खरडून गेली तर २,२२,४१० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वाधिक १,२२,४५६ हेक्टर क्षेत्र अकोला जिल्ह्यात आहे. अमरावती ७७,४३४, यवतमाळ १८,६९९, बुलडाणा १,५७४ व वाशिम जिल्ह्यात २,२४४ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे.