शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

१०,२१२ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:11 IST

(असाईनमेंट) अमरावती : कृषी विभागांतर्गत विवध योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज आता भासणार नाही. या योजनांचा लाभ आता एकाच ...

(असाईनमेंट)

अमरावती : कृषी विभागांतर्गत विवध योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज आता भासणार नाही. या योजनांचा लाभ आता एकाच अजार्द्वारे घेता येणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी ( डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर) या थेट लाभार्थींना लाभ हस्तांतरणाच्या संकेत स्थळावर २८ डिसेंबरपर्यंत १० हजार २९२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

नोंदणीसाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना कृषी विभागामार्फत राबविल्या जातात. या प्रत्येक योजनेसाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करावा लागतो. त्यात वेळ जातो, शिवाय प्रत्यक्ष लाभ मिळायलाही विलंब लागतो. यासाठी कृषी विभागाने आता महाडीबीटी हे संकेतस्थळ ‘एनआयसी’च्या माध्यमातून विकसित केले आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करावा लागत आहे. काही ठिकाणी इंटरनेटच्या तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

अशी करावी नोंदणी

संकेत स्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा लागतो. शेतकरी स्वताचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतींमधील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून संकेत स्थळावर जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकतात. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेत स्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागतो.

कोट

अधिकाधिक सहभाग व्हावा

महाडीबीटी संकेतस्थळावरील नोंदणीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभत आहे. अशा पद्धतीची संगणकीय प्रणाली पहिल्यांदा वापरली जात आहे. यामुळे शेतकरी बांधवाचा त्रास कमी होऊन महाडीबीटीद्वारे योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार आहे, सोडत पद्धतीने पारदर्शकताही आहे. ३१ डिसेंबर अंतिम मुदत असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

विजय चवाळे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

कोट

नोंदणीचा कालावधी वाढवा

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही नोंदणी आहे. काही भागात रेंज बरोबर मिळत नसल्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेकदा वेगही राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रावर चकरा माराव्या लागतात. अनेक शेतकऱ्यांना याविषयीची माहितीच नसल्यामुळे ३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी न झाल्यास त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखे होईल. त्यामुळे नोंदणीचा कालावधी वाढून देण्यात यावा.

भोजराज कावरे, शेतकरी, हिरापूर.

बॉक्स

या योजनांसाठी आता एकच अर्ज

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषिक्रांती योजना, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आदी योजनांसाठी आता एकच अर्ज लागणार आहे.