शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

१०,२१२ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:11 IST

(असाईनमेंट) अमरावती : कृषी विभागांतर्गत विवध योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज आता भासणार नाही. या योजनांचा लाभ आता एकाच ...

(असाईनमेंट)

अमरावती : कृषी विभागांतर्गत विवध योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज आता भासणार नाही. या योजनांचा लाभ आता एकाच अजार्द्वारे घेता येणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी ( डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर) या थेट लाभार्थींना लाभ हस्तांतरणाच्या संकेत स्थळावर २८ डिसेंबरपर्यंत १० हजार २९२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.

नोंदणीसाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना कृषी विभागामार्फत राबविल्या जातात. या प्रत्येक योजनेसाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करावा लागतो. त्यात वेळ जातो, शिवाय प्रत्यक्ष लाभ मिळायलाही विलंब लागतो. यासाठी कृषी विभागाने आता महाडीबीटी हे संकेतस्थळ ‘एनआयसी’च्या माध्यमातून विकसित केले आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करावा लागत आहे. काही ठिकाणी इंटरनेटच्या तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

अशी करावी नोंदणी

संकेत स्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा लागतो. शेतकरी स्वताचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतींमधील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून संकेत स्थळावर जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकतात. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेत स्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागतो.

कोट

अधिकाधिक सहभाग व्हावा

महाडीबीटी संकेतस्थळावरील नोंदणीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभत आहे. अशा पद्धतीची संगणकीय प्रणाली पहिल्यांदा वापरली जात आहे. यामुळे शेतकरी बांधवाचा त्रास कमी होऊन महाडीबीटीद्वारे योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार आहे, सोडत पद्धतीने पारदर्शकताही आहे. ३१ डिसेंबर अंतिम मुदत असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

विजय चवाळे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

कोट

नोंदणीचा कालावधी वाढवा

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही नोंदणी आहे. काही भागात रेंज बरोबर मिळत नसल्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेकदा वेगही राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रावर चकरा माराव्या लागतात. अनेक शेतकऱ्यांना याविषयीची माहितीच नसल्यामुळे ३१ डिसेंबरपूर्वी नोंदणी न झाल्यास त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखे होईल. त्यामुळे नोंदणीचा कालावधी वाढून देण्यात यावा.

भोजराज कावरे, शेतकरी, हिरापूर.

बॉक्स

या योजनांसाठी आता एकच अर्ज

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषिक्रांती योजना, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आदी योजनांसाठी आता एकच अर्ज लागणार आहे.