शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

१ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा

By admin | Updated: February 3, 2015 22:48 IST

यंदा अल्प पाऊस पडला त्यामुळे खरीपाचे उत्पन्न पूर्णत: हातून गेले. त्यानंतर रब्बीचा पेराही घटला परिणामी १९७२ नंतर जिल्ह्यात सर्वात मोठा दुष्काळ पडला. शेतकरी आर्थिक अडचणीत आले.

अमरावती : यंदा अल्प पाऊस पडला त्यामुळे खरीपाचे उत्पन्न पूर्णत: हातून गेले. त्यानंतर रब्बीचा पेराही घटला परिणामी १९७२ नंतर जिल्ह्यात सर्वात मोठा दुष्काळ पडला. शेतकरी आर्थिक अडचणीत आले. पीडित शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत घोषित केली असून, जिल्ह्यातील १९८१ गावांमधील १ लाख ७० हजार शेतकऱ्यांना १२५ कोटी ७९ लाख रूपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. यावर्षी सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस या पिकांचे उत्पन्न घटले, किडीचा प्रादूर्भाव आणि धुक्यामुळे कपाशी, तूर, हरभरा या पिकांना दगा दिला दरम्यान जो काही कापूस हाती आला त्याला अल्प भाव मिळत आहे. त्यातही गत वर्षीपेक्षा तब्बल १ हजार २०० रूपये भाव आहे. दुसरीकडे महागाई वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे.त्यामुळे शासनाने सर्वेक्षण करून हेक्टरी ४ हजार ५०० रूपये आर्थिक मदत घोषित केली आहे. जिल्ह्यातील एकूण ७ लाख ५ हजार २६८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात शासनाकडून ४० टक्के निधी मिळाला होता. त्यानुसार शेतकऱ्यांचे बँक खातेवर मदत जमा केली जात आहे. यासाठी राज्य शासनाने जिल्ह्याला १२५ कोटी ७९ लाख रूपयांचा निधी दिला आहे. १४ तालुक्यात मदत वाटपाचे काम सुरू आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होईल. (प्रतिनिधी)