शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

१ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा

By admin | Updated: February 3, 2015 22:48 IST

यंदा अल्प पाऊस पडला त्यामुळे खरीपाचे उत्पन्न पूर्णत: हातून गेले. त्यानंतर रब्बीचा पेराही घटला परिणामी १९७२ नंतर जिल्ह्यात सर्वात मोठा दुष्काळ पडला. शेतकरी आर्थिक अडचणीत आले.

अमरावती : यंदा अल्प पाऊस पडला त्यामुळे खरीपाचे उत्पन्न पूर्णत: हातून गेले. त्यानंतर रब्बीचा पेराही घटला परिणामी १९७२ नंतर जिल्ह्यात सर्वात मोठा दुष्काळ पडला. शेतकरी आर्थिक अडचणीत आले. पीडित शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत घोषित केली असून, जिल्ह्यातील १९८१ गावांमधील १ लाख ७० हजार शेतकऱ्यांना १२५ कोटी ७९ लाख रूपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. यावर्षी सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस या पिकांचे उत्पन्न घटले, किडीचा प्रादूर्भाव आणि धुक्यामुळे कपाशी, तूर, हरभरा या पिकांना दगा दिला दरम्यान जो काही कापूस हाती आला त्याला अल्प भाव मिळत आहे. त्यातही गत वर्षीपेक्षा तब्बल १ हजार २०० रूपये भाव आहे. दुसरीकडे महागाई वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे.त्यामुळे शासनाने सर्वेक्षण करून हेक्टरी ४ हजार ५०० रूपये आर्थिक मदत घोषित केली आहे. जिल्ह्यातील एकूण ७ लाख ५ हजार २६८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात शासनाकडून ४० टक्के निधी मिळाला होता. त्यानुसार शेतकऱ्यांचे बँक खातेवर मदत जमा केली जात आहे. यासाठी राज्य शासनाने जिल्ह्याला १२५ कोटी ७९ लाख रूपयांचा निधी दिला आहे. १४ तालुक्यात मदत वाटपाचे काम सुरू आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होईल. (प्रतिनिधी)