शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

१,९६३ गावांची नजरअंदाज ७० पैसेवारी

By admin | Updated: October 4, 2016 00:18 IST

जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून ३५ दिवस पावसात खंड असल्याने हलक्या व मध्यम जमिनीतील सोयाबीन करपले,

उफराटा न्याय : सोयाबीन बाधित, उडीद, कपाशीचेही नुकसानअमरावती : जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून ३५ दिवस पावसात खंड असल्याने हलक्या व मध्यम जमिनीतील सोयाबीन करपले, अती पावसाने तूर जळाली व आता दोन आठवड्यांपासून परतीच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगात कोंब निघत आहेत. कपाशीची पानगळ होत असताना जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ७० पैसे जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. यामुळे शेतकरी वर्गात चीड व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा १२० टक्के पाऊस पडला. १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान ८१४ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९७७.१ मि.मी.पाऊस पडला. पेरणीपासून समाधानकारक पाऊस असल्याने पिके चांगली होती. मात्र सततच्या पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढून हजारो एकरांतील तुरीवर आकस्मिक मर येऊन तूर जागीच जळाली.७ आॅगस्टपासून पावसात खंड असल्याने हलक्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. हे सोयाबीन करपले, दाना बारीक होऊन शेंगा पोचट राहिल्या. आता सोयाबीन कापनीवर आले असताना गेल्या १५ दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, वातावरणात व जमिनीत वाढलेली आर्द्रता यामुळे परिपक्व झालेल्या सोयाबीनच्या शेंगांमधून दाने अंकुरात आहे. तसेच उडदाच्या गंजीमध्येही दाण्यांना कोंब फुटले आहे. अति पावसामुळे बीटी कपाशीची पातेगळ होत आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात सरासरी उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमिवर ३० सप्टेंबरला जिल्हा प्रशासनाने १ हजार ९६३ गावांची नजरअंदाज पैसेवारी ही ७० पैसे जाहीर केल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी शासकीय मदत मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)