शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१,९६३ गावांची नजरअंदाज ७० पैसेवारी

By admin | Updated: October 4, 2016 00:18 IST

जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून ३५ दिवस पावसात खंड असल्याने हलक्या व मध्यम जमिनीतील सोयाबीन करपले,

उफराटा न्याय : सोयाबीन बाधित, उडीद, कपाशीचेही नुकसानअमरावती : जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून ३५ दिवस पावसात खंड असल्याने हलक्या व मध्यम जमिनीतील सोयाबीन करपले, अती पावसाने तूर जळाली व आता दोन आठवड्यांपासून परतीच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगात कोंब निघत आहेत. कपाशीची पानगळ होत असताना जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ७० पैसे जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. यामुळे शेतकरी वर्गात चीड व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा १२० टक्के पाऊस पडला. १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान ८१४ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९७७.१ मि.मी.पाऊस पडला. पेरणीपासून समाधानकारक पाऊस असल्याने पिके चांगली होती. मात्र सततच्या पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढून हजारो एकरांतील तुरीवर आकस्मिक मर येऊन तूर जागीच जळाली.७ आॅगस्टपासून पावसात खंड असल्याने हलक्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. हे सोयाबीन करपले, दाना बारीक होऊन शेंगा पोचट राहिल्या. आता सोयाबीन कापनीवर आले असताना गेल्या १५ दिवसांपासून परतीचा पाऊस होत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, वातावरणात व जमिनीत वाढलेली आर्द्रता यामुळे परिपक्व झालेल्या सोयाबीनच्या शेंगांमधून दाने अंकुरात आहे. तसेच उडदाच्या गंजीमध्येही दाण्यांना कोंब फुटले आहे. अति पावसामुळे बीटी कपाशीची पातेगळ होत आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात सरासरी उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमिवर ३० सप्टेंबरला जिल्हा प्रशासनाने १ हजार ९६३ गावांची नजरअंदाज पैसेवारी ही ७० पैसे जाहीर केल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी शासकीय मदत मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी)