शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

अप्पर वर्धातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:17 IST

अप्पर वर्धा धरणाचा परिसर १० हजार हेक्टरचा असून सद्यस्थितीत त्यामध्ये ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने धरणातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देनियोजनाची गरज : धरणात ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक, उन्हाळा निभणार!

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अप्पर वर्धा धरणाचा परिसर १० हजार हेक्टरचा असून सद्यस्थितीत त्यामध्ये ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने धरणातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिली आहे.अप्पर वर्धा धरणात सद्यस्थितीत ८५ दलघमी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. अप्पर वर्धा धरणातूनच अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो. अमरावती शहराची वर्षभराची ४६ दश लक्ष घन मीटरची मागणी आहे.सद्यस्थिती उन्हापा पारा वाढल्याने बाष्पीभवन गतीने होत आहे. प्रतिदिन ०.५५ दलघमी म्हणजे त्याची टँकरमध्ये तुलना केली, तर ५५ हजार टँकर एवढे पाण्याचे रोज बाष्पीभवन होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. धरणाच्या पाण्याच्या पातळीत रोज घट होत असल्याने व आणखी महिनाभर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागत असल्याने शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणव्दारे एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणात ३१ जुलैपर्यंत ४५ दलघमी एवढा जिवंत साठा असायला हवा. सद्यस्थित धरणात ११४ दलघमी मृतसाठा शिल्लक आहे. गरज भासल्यास त्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर करण्यात येतो. पण धरणात सध्यातरी तशी परिस्थिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. धरणात उन्हाळा पार पाडण्याइतका पाणीसाठा शिल्लक असला, तरी नागरिकांनी योग्यरित्या पाण्याचा वापर करावा, असे आवाहन जलतज्ज्ञांनी नागरिकांना केले आहे.तीन नद्यांमधून येते धरणात पाणीमध्यप्रदेशमध्ये पाणी पडले तरच अप्पर वर्धा धरणात पाणी येते. वर्धा नदी, माडू नदी, व जाम नदीतून अप्पर वर्धा धरणात पाणी येण्याचे स्त्रोत आहेत. या तीनही नद्यांचा उगम मध्यप्रदेशातून असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. त्यामुळे मध्यप्रदेशात अपेक्षित पाऊस झाला तरच धरण भरते. विशेष: परतीचा जो पाऊस असतो तो पुरामुळे धरणात पाणी साठण्यासाठी मदतीचा ठरतो.दहा वर्षांनी धरण शंभर टक्के भरले नाही?गेल्या २० वर्षांत तीनदा अप्पर वर्धा धरण शंभर टक्के भरले नसल्याची माहिती समोर आली आहे. १९९८,२००८ व २०१८ या वर्षांत धरण शंभर टक्के भरले नाही. मागील वर्षी धरण ५२ टक्केच भरले होते. धरणाच्या लाभक्षेत्रात ८५० मीमी पावसाची गरज होती. पण इतका पाऊस पडला नाही.अप्पर वर्धा धरणात ८५ दलघमी पाणीसाठा आहे. अमरावती शहराची वर्षभराची ४६ दलघमी पाण्याची मागणी आहे. उन्हाचा पार वाढल्यान धरणातून रोज ०.५५ दलघमी बाष्पीभवन होत आहे.- प्रमोद पोटफोडे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग अमरावती