शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
3
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
4
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
5
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
6
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
7
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
8
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
9
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
10
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
11
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
12
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
13
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
14
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
15
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
16
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
17
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
18
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
19
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
20
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:17 IST

अप्पर वर्धा धरणाचा परिसर १० हजार हेक्टरचा असून सद्यस्थितीत त्यामध्ये ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने धरणातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देनियोजनाची गरज : धरणात ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक, उन्हाळा निभणार!

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अप्पर वर्धा धरणाचा परिसर १० हजार हेक्टरचा असून सद्यस्थितीत त्यामध्ये ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने धरणातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिली आहे.अप्पर वर्धा धरणात सद्यस्थितीत ८५ दलघमी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. अप्पर वर्धा धरणातूनच अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो. अमरावती शहराची वर्षभराची ४६ दश लक्ष घन मीटरची मागणी आहे.सद्यस्थिती उन्हापा पारा वाढल्याने बाष्पीभवन गतीने होत आहे. प्रतिदिन ०.५५ दलघमी म्हणजे त्याची टँकरमध्ये तुलना केली, तर ५५ हजार टँकर एवढे पाण्याचे रोज बाष्पीभवन होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. धरणाच्या पाण्याच्या पातळीत रोज घट होत असल्याने व आणखी महिनाभर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागत असल्याने शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणव्दारे एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणात ३१ जुलैपर्यंत ४५ दलघमी एवढा जिवंत साठा असायला हवा. सद्यस्थित धरणात ११४ दलघमी मृतसाठा शिल्लक आहे. गरज भासल्यास त्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर करण्यात येतो. पण धरणात सध्यातरी तशी परिस्थिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. धरणात उन्हाळा पार पाडण्याइतका पाणीसाठा शिल्लक असला, तरी नागरिकांनी योग्यरित्या पाण्याचा वापर करावा, असे आवाहन जलतज्ज्ञांनी नागरिकांना केले आहे.तीन नद्यांमधून येते धरणात पाणीमध्यप्रदेशमध्ये पाणी पडले तरच अप्पर वर्धा धरणात पाणी येते. वर्धा नदी, माडू नदी, व जाम नदीतून अप्पर वर्धा धरणात पाणी येण्याचे स्त्रोत आहेत. या तीनही नद्यांचा उगम मध्यप्रदेशातून असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. त्यामुळे मध्यप्रदेशात अपेक्षित पाऊस झाला तरच धरण भरते. विशेष: परतीचा जो पाऊस असतो तो पुरामुळे धरणात पाणी साठण्यासाठी मदतीचा ठरतो.दहा वर्षांनी धरण शंभर टक्के भरले नाही?गेल्या २० वर्षांत तीनदा अप्पर वर्धा धरण शंभर टक्के भरले नसल्याची माहिती समोर आली आहे. १९९८,२००८ व २०१८ या वर्षांत धरण शंभर टक्के भरले नाही. मागील वर्षी धरण ५२ टक्केच भरले होते. धरणाच्या लाभक्षेत्रात ८५० मीमी पावसाची गरज होती. पण इतका पाऊस पडला नाही.अप्पर वर्धा धरणात ८५ दलघमी पाणीसाठा आहे. अमरावती शहराची वर्षभराची ४६ दलघमी पाण्याची मागणी आहे. उन्हाचा पार वाढल्यान धरणातून रोज ०.५५ दलघमी बाष्पीभवन होत आहे.- प्रमोद पोटफोडे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग अमरावती