शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:17 IST

अप्पर वर्धा धरणाचा परिसर १० हजार हेक्टरचा असून सद्यस्थितीत त्यामध्ये ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने धरणातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देनियोजनाची गरज : धरणात ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक, उन्हाळा निभणार!

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अप्पर वर्धा धरणाचा परिसर १० हजार हेक्टरचा असून सद्यस्थितीत त्यामध्ये ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने धरणातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी दिली आहे.अप्पर वर्धा धरणात सद्यस्थितीत ८५ दलघमी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. अप्पर वर्धा धरणातूनच अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो. अमरावती शहराची वर्षभराची ४६ दश लक्ष घन मीटरची मागणी आहे.सद्यस्थिती उन्हापा पारा वाढल्याने बाष्पीभवन गतीने होत आहे. प्रतिदिन ०.५५ दलघमी म्हणजे त्याची टँकरमध्ये तुलना केली, तर ५५ हजार टँकर एवढे पाण्याचे रोज बाष्पीभवन होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. धरणाच्या पाण्याच्या पातळीत रोज घट होत असल्याने व आणखी महिनाभर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागत असल्याने शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणव्दारे एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणात ३१ जुलैपर्यंत ४५ दलघमी एवढा जिवंत साठा असायला हवा. सद्यस्थित धरणात ११४ दलघमी मृतसाठा शिल्लक आहे. गरज भासल्यास त्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर करण्यात येतो. पण धरणात सध्यातरी तशी परिस्थिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. धरणात उन्हाळा पार पाडण्याइतका पाणीसाठा शिल्लक असला, तरी नागरिकांनी योग्यरित्या पाण्याचा वापर करावा, असे आवाहन जलतज्ज्ञांनी नागरिकांना केले आहे.तीन नद्यांमधून येते धरणात पाणीमध्यप्रदेशमध्ये पाणी पडले तरच अप्पर वर्धा धरणात पाणी येते. वर्धा नदी, माडू नदी, व जाम नदीतून अप्पर वर्धा धरणात पाणी येण्याचे स्त्रोत आहेत. या तीनही नद्यांचा उगम मध्यप्रदेशातून असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. त्यामुळे मध्यप्रदेशात अपेक्षित पाऊस झाला तरच धरण भरते. विशेष: परतीचा जो पाऊस असतो तो पुरामुळे धरणात पाणी साठण्यासाठी मदतीचा ठरतो.दहा वर्षांनी धरण शंभर टक्के भरले नाही?गेल्या २० वर्षांत तीनदा अप्पर वर्धा धरण शंभर टक्के भरले नसल्याची माहिती समोर आली आहे. १९९८,२००८ व २०१८ या वर्षांत धरण शंभर टक्के भरले नाही. मागील वर्षी धरण ५२ टक्केच भरले होते. धरणाच्या लाभक्षेत्रात ८५० मीमी पावसाची गरज होती. पण इतका पाऊस पडला नाही.अप्पर वर्धा धरणात ८५ दलघमी पाणीसाठा आहे. अमरावती शहराची वर्षभराची ४६ दलघमी पाण्याची मागणी आहे. उन्हाचा पार वाढल्यान धरणातून रोज ०.५५ दलघमी बाष्पीभवन होत आहे.- प्रमोद पोटफोडे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग अमरावती