शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

०.३३ एफएसआयची मंजुरी

By admin | Updated: May 22, 2015 00:34 IST

शहरातील भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा योजनांचे दोन टप्पे व राजापेठ उड्डाण पुलासाठी शासन निधी देणार आहे.

अमरावती : शहरातील भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा योजनांचे दोन टप्पे व राजापेठ उड्डाण पुलासाठी शासन निधी देणार आहे. महापालिकेचा आर्थिक विकास होण्यासाठी ०.३३ एफएसआय प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये जेवढे पैसे जमा होईल तेवढाच निधी शासन देणार आहे. यासाठी भांडवली खर्चाचे खाते उघडण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अमरावतीचा ‘स्मार्ट सिटीमध्ये समावेशाची घोषणा योग्यवेळी केली जाणार असल्याचे त्यांनी सूचकपणे सांगितले. नांदगावपेठ येथील औद्योगिक वसाहतीत वस्त्रोद्योग उद्यानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या टेक्सटाईल पार्कमध्ये सध्या सात उद्योगांची नोंदणी झाली आहे. यापैकी एका उद्योगातून उत्पादन सुरू झाले. दोन उद्योग प्रगतीपथावर आहेत. चार उद्योगांच्या कामांना सुरुवात झाली आहे. २७०० कोटी रुपयांची गुंतवणूक या उद्योगांमुळे झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवारअंतर्गत पाण्याच्या साठ्याचे विकेंद्रीकरण करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे करायची आहेत. कामात पारदर्शीपणा आणण्यासाठी एमआरएसईचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. याअंतर्गत कामांची स्थिती पाहता येथे राज्य शासनाचा कार्यक्रम हा आता जनतेचा कार्यक्रम बनला आहे. यामुळे प्रत्येक गाव जलस्वयंपूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. काय आहे एफएसआय ?मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम केल्यास त्यानंतर अतिरिक्त बांधकामास मान्यता मिळत नाही. परंतु एफएसआय लागू झाल्यानंतर आता मालमत्ताधारकांना रीतसर अर्ज करुन अतिरिक्त बांधकाम नियमित करुन घेता येईल. त्याकरिता निवासी, औद्योगिक वापरासाठी पाच तर वाणिज्य वापराकरिता ८० टक्के प्रिमीयम भरुन सदर बांधकाम नियमित करुन घेता येईल, असे महापालिका सहायक संचालक नगररचना अधिकारी सुरेंद्र कांबळे यांनी सांगितले.उद्योजकांना भूखंड वाटपनांदगाव पेठ येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या श्याम इंडोफेब, व्हीएचएम लिमिटेड, सियाराम सिल्क मिल, सूर्यलक्ष्मी कॉटन मील, बालेश्वर सिंथेटिक, प्रभूदयाल पॉलिस्टर, गोल्डन फायबर एलएलपी कंपनीना भूखंड वाटपाचे प्रमाणपत्र याप्रसंगी देण्यात आले.