शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जिल्हा परिषदेत निधी अडकला!

By admin | Updated: March 20, 2017 02:52 IST

अकोला जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचा-यांच्या लेखणी बंद आंदोलनाचा परिनाम.

अकोला, दि. १९- ऐन मार्चअखेरच्या काळात निधी खर्चाची धांदल असताना जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचार्‍यांनी गेल्या सहा दिवसांपासून लेखणी बंद ठेवली आहे. त्यामुळे अनेक विभागाच्या खर्चाची देयके तर अडकलीच शिवाय विविध योजनांचा निधी, शिक्षक, कर्मचार्‍यांच्या वेतनाचाही वांधा झाला आहे. त्यातच शासनाने कर्मचारी संघटनेच्या मागणीचा कुठलाही विचार न केल्याने संप सुरूच राहणार असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने शासनाकडे वारंवार मागण्या मांडल्या. त्यावर काहीही तोडगा न निघाल्याने संघटनेच्यावतीने आधी काळ्य़ा फिती लावून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर १५ मार्चपासून कार्यालयात उपस्थित राहून लेखणी बंद आंदोलन सुरू आहे. जिल्हा परिषद लेखा कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासांठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यावर शासनाकडून काहीच उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे संघटनेकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जात आहे. आंदोलनाला जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आता शासनाने दखल न घेतल्यास मंत्रालय परिसरात धरणे आंदोलन आणि बेमुदत उपोषण केले जाणार आहे. सर्व आंदोलनात लेखा कर्मचार्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर एकघरे, उपाध्यक्ष सुरेश तिडके, सचिव जगदीश बेंद्रे, उपाध्यक्ष रवींद्र मानकर, कार्यकारिणी सदस्य विजय शिंदे, नितीन आखरे, सदस्य ए.पी. भागवत, नरेंद्र राऊत, व्ही.पी. राठोड, टी.एस. रायबोले, मीना रोकडे, आर.एस. थोरात, अरविंद डाखोरे, डी.बी. धार्मिक, प्रियंका देशमुख, लिना पुंडकर, सुधीर देशमुख, प्रसिद्धीप्रमुख अंकुश पटेल यांनी केले आहे.८0 ते ९0 टक्के निधी खर्चाचा वांधाजिल्हा परिषदेच्या विविध विभागाला वर्षभरात मंजूर अनुदानापैकी ८0 ते ९0 टक्के निधी मार्चअखेर प्राप्त होतो. त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर खर्च केला जातो. त्या बाबींची संपूर्ण जबाबदारी लेखा कर्मचार्‍यांवर आहे. प्राप्त अनुदान कोषागारातून काढणे, जिल्हा परिषद स्तरावर देयके पारित करणे, ही कामे बंद आहेत. त्यामुळे आता निधी मार्चअखेर खर्च करण्याचे आव्हान पदाधिकार्‍यांसह प्रशासनापुढे आहे. घरकुलाचे पैसे वाटप थांबले!प्रधानमंत्री आवास योजनेतून चालू वर्षात ४१९४ लाभार्थींना घरकुलाचा लाभ दिला जात आहे. त्यांची ऑनलाइन नोंदणी झाली तरी गेल्या चार दिवसांपासून लेखा कर्मचार्‍यांच्या संपामुळे निधी वाटप रखडले आहे. तर शासनाने वाढवून दिलेल्या ४३१५ लाभार्थींची निवड आणि नोंदणीचे काम पाहता अधिकार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात ठाण मांडून बसत आहेत.