शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

जिल्हा परिषदेत निधी अडकला!

By admin | Updated: March 20, 2017 02:52 IST

अकोला जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचा-यांच्या लेखणी बंद आंदोलनाचा परिनाम.

अकोला, दि. १९- ऐन मार्चअखेरच्या काळात निधी खर्चाची धांदल असताना जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचार्‍यांनी गेल्या सहा दिवसांपासून लेखणी बंद ठेवली आहे. त्यामुळे अनेक विभागाच्या खर्चाची देयके तर अडकलीच शिवाय विविध योजनांचा निधी, शिक्षक, कर्मचार्‍यांच्या वेतनाचाही वांधा झाला आहे. त्यातच शासनाने कर्मचारी संघटनेच्या मागणीचा कुठलाही विचार न केल्याने संप सुरूच राहणार असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने शासनाकडे वारंवार मागण्या मांडल्या. त्यावर काहीही तोडगा न निघाल्याने संघटनेच्यावतीने आधी काळ्य़ा फिती लावून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर १५ मार्चपासून कार्यालयात उपस्थित राहून लेखणी बंद आंदोलन सुरू आहे. जिल्हा परिषद लेखा कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासांठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यावर शासनाकडून काहीच उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे संघटनेकडून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जात आहे. आंदोलनाला जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आता शासनाने दखल न घेतल्यास मंत्रालय परिसरात धरणे आंदोलन आणि बेमुदत उपोषण केले जाणार आहे. सर्व आंदोलनात लेखा कर्मचार्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर एकघरे, उपाध्यक्ष सुरेश तिडके, सचिव जगदीश बेंद्रे, उपाध्यक्ष रवींद्र मानकर, कार्यकारिणी सदस्य विजय शिंदे, नितीन आखरे, सदस्य ए.पी. भागवत, नरेंद्र राऊत, व्ही.पी. राठोड, टी.एस. रायबोले, मीना रोकडे, आर.एस. थोरात, अरविंद डाखोरे, डी.बी. धार्मिक, प्रियंका देशमुख, लिना पुंडकर, सुधीर देशमुख, प्रसिद्धीप्रमुख अंकुश पटेल यांनी केले आहे.८0 ते ९0 टक्के निधी खर्चाचा वांधाजिल्हा परिषदेच्या विविध विभागाला वर्षभरात मंजूर अनुदानापैकी ८0 ते ९0 टक्के निधी मार्चअखेर प्राप्त होतो. त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर खर्च केला जातो. त्या बाबींची संपूर्ण जबाबदारी लेखा कर्मचार्‍यांवर आहे. प्राप्त अनुदान कोषागारातून काढणे, जिल्हा परिषद स्तरावर देयके पारित करणे, ही कामे बंद आहेत. त्यामुळे आता निधी मार्चअखेर खर्च करण्याचे आव्हान पदाधिकार्‍यांसह प्रशासनापुढे आहे. घरकुलाचे पैसे वाटप थांबले!प्रधानमंत्री आवास योजनेतून चालू वर्षात ४१९४ लाभार्थींना घरकुलाचा लाभ दिला जात आहे. त्यांची ऑनलाइन नोंदणी झाली तरी गेल्या चार दिवसांपासून लेखा कर्मचार्‍यांच्या संपामुळे निधी वाटप रखडले आहे. तर शासनाने वाढवून दिलेल्या ४३१५ लाभार्थींची निवड आणि नोंदणीचे काम पाहता अधिकार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात ठाण मांडून बसत आहेत.