शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

हमीभावाने तूर खरेदी शून्यच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST

खरिपात अतिवृष्टी झाल्याने तूर पिकाला फटका बसला. त्याचबरोबर उत्पादन घटले. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये तुरीची आवकही घटली. आवक कमी झाली ...

खरिपात अतिवृष्टी झाल्याने तूर पिकाला फटका बसला. त्याचबरोबर उत्पादन घटले. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये तुरीची आवकही घटली. आवक कमी झाली आणि मागणी वाढली की दरात वाढ होते, या अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे बाजार समित्यांत तुरीच्या दरात वाढ झाली. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात ७ आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. या केंद्रावर जिल्ह्यातील ७ हजार १८ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली; परंतु खुल्या बाजारपेठेत अधिक दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा तुरीची एक रुपयाचीही खरेदी होऊ शकली नाही.

--बॉक्स--

हंगाम संपल्यानंतर आवक सुरूच!

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक ५१७ क्विंटलपर्यंत होत आहे. कमाल भाव ६ हजार ९००, सर्वसाधारण ६ हजार ५०० तर किमान दर ६ हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरी क्विंटलमागे ५०० रुपये अधिक पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणीच केली आहे.

--बॉक्स--

शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

दरवर्षी खरेदी केंद्रावर सोयाबीन, तूर, हरभरा विक्रीसाठी रांगा लागत असतात; परंतु यंदा बाजारपेठेत अधिक दर मिळू लागल्याने एकाही शेतकऱ्याने तूर विक्री केली नाही. तूर विक्रीसाठी ७ हजार १८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती व सगळ्या शेतकऱ्यांना मॅसेज पाठविण्यात आले आहे, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.