शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
2
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
3
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
4
भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
5
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
6
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
7
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
8
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
9
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
10
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
11
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
12
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
13
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
14
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
15
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
16
२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
17
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
18
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
19
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
20
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
Daily Top 2Weekly Top 5

युवकांच्या आत्महत्या चिंताजनक

By admin | Updated: August 10, 2014 00:20 IST

चिंतनाची गरज : जास्त प्रमाण १८ ते ३५ वयोगटातील

खामगाव : जीवनामध्ये आलेली निराशा, वैफल्यग्रस्त जीवन, तसेच घरातील छोटे मोठे वाद, मित्रांशी भांडणे, परिक्षेत अपयश अशा विविध कारणावरुन समाजात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षभरात खामगाव येथील सामान्य रुग्णालयात अशा आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या ४३0 जणांवर उपचार करण्यात आले. यामध्ये ७0 टक्के प्रमाण हे १८ ते ३५ वयोगटातील असल्याचे दिसून आले आहे.समाजामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला कुटूंबासोबतच बाहेरही सर्वांसोबत संबंध प्रस्थापित करावे लागतात. तसेच आयुष्याच्या अखेरचे दिवस सुखात जाण्यासाठी माणूस प्रयत्नरत असतो. सध्याच्या संगणकाच्या युगात तर प्रत्येकजण आधुनीक तंत्रज्ञानाशी जुळला आहे. जीवनाच्या या वाटेवर मात्र प्रगतीकडे असताना अपयश, छोट्या मोठय़ा कारणावरुन कुटूंबातील सदस्यांशी वाद, प्रेयसी वा प्रियकराकडून झालेल्या प्रेमभंग, शैक्षणिक घसरण यामुळे जीवनात निराशा प्राप्त होते. माणसातील समजुतदारपणा कमी झाल्यामुळे तो आयुष्याला कंटाळून या अख्या जगाचा निरोप घ्यायचा म्हणून आत्महत्येचा मार्ग पत्करतो. जीवनात यापुढे अंधकारमय वातावरण असल्याचा त्याला भास होवून स्वत:चे आयुष्य संपविण्याचे प्रयत्न होतात.खामगाव येथील सामान्य रुग्णालयात मार्च २0१३ ते जुलै २0१४ या कालावधीत तब्बल ४३0 जणांनी विषप्राशन तसेच अन्य मार्गाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये १३२ महिला तर २९८ पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न केलेला ४३0 जणांपैकी ७0 टक्के प्रमाण हे १९ ते ३५ वयोगटातील असल्याचे दिसून आले आहे. युवकांचा आत्महत्येकडे वाढलेला कल ही आज धक्कादायक बाब असून याला प्रतिबंध घालण्यासाठी समाजातील विविध संघटनांनी पुढे येवून चिंतनाची गरज आहे.