शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

समाज, राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे!

By admin | Updated: December 24, 2015 02:49 IST

गायत्री महायज्ञात विरेश्‍वर उपाध्याय यांचे प्रतिपादन.

अकोला: विज्ञान युगात येणारा प्रत्येक क्षण परिवर्तनशील आहे. परिवर्तनासोबत येणार्‍या संकटांना धैर्याने तोंड देण्याची गरज आहे. त्यासाठी उत्साही व सक्षम युवकांची आवश्यकता आहे. समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन शांतीकुंज हरिद्वार येथील विरेश्‍वर उपाध्याय यांनी बुधवारी येथे केले. अखिल भारतीय गायत्री परिवार, शांतीकुंज हरिद्वार यांच्या वतीने येथील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात २२ डिसेंबरपासून १0८ कुंडीय गायत्री महायज्ञास सुरुवात झाली. विद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ह्यभक्तिधामह्णमध्ये तयार करण्यात आलेल्या १0८ यज्ञकुंडांमध्ये गायत्री मंत्रोच्चारात विविध गावांमधून आलेल्या शेकडो दाम्पत्यांनी बुधवारी दुसर्‍या दिवशीही आहुती अर्पण केली. दुपारच्या सत्रात विरेश्‍वर उपाध्याय यांचे ह्यशिक्षा के साथ विद्या भीह्ण या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना विरेश्‍वर उपाध्याय म्हणाले, की आजच्या धावपळीच्या युगात मानवाने जगण्याची परिभाषाच बदलून टाकली आहे. काहींनी अनैतिक व्यवहार स्वीकारले असून, कमी श्रमात जास्त पैसा कमविण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. ज्या लोकांमध्ये संयम व धैर्य असते, त्यांना गायत्री देवतेचा आशीर्वाद लाभतो. गायत्री देवीचे वाहन हंस आहे. हंसात दूध आणि पाणी वेगवेगळे करण्याचा गुण आहे. म्हणून आजच्या युगात हंसाचा हा गुण मनुष्याने आत्मसात केला पाहिजे, असेही ते म्हणाले.