शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

समाज, राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे!

By admin | Updated: December 24, 2015 02:49 IST

गायत्री महायज्ञात विरेश्‍वर उपाध्याय यांचे प्रतिपादन.

अकोला: विज्ञान युगात येणारा प्रत्येक क्षण परिवर्तनशील आहे. परिवर्तनासोबत येणार्‍या संकटांना धैर्याने तोंड देण्याची गरज आहे. त्यासाठी उत्साही व सक्षम युवकांची आवश्यकता आहे. समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन शांतीकुंज हरिद्वार येथील विरेश्‍वर उपाध्याय यांनी बुधवारी येथे केले. अखिल भारतीय गायत्री परिवार, शांतीकुंज हरिद्वार यांच्या वतीने येथील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात २२ डिसेंबरपासून १0८ कुंडीय गायत्री महायज्ञास सुरुवात झाली. विद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ह्यभक्तिधामह्णमध्ये तयार करण्यात आलेल्या १0८ यज्ञकुंडांमध्ये गायत्री मंत्रोच्चारात विविध गावांमधून आलेल्या शेकडो दाम्पत्यांनी बुधवारी दुसर्‍या दिवशीही आहुती अर्पण केली. दुपारच्या सत्रात विरेश्‍वर उपाध्याय यांचे ह्यशिक्षा के साथ विद्या भीह्ण या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना विरेश्‍वर उपाध्याय म्हणाले, की आजच्या धावपळीच्या युगात मानवाने जगण्याची परिभाषाच बदलून टाकली आहे. काहींनी अनैतिक व्यवहार स्वीकारले असून, कमी श्रमात जास्त पैसा कमविण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. ज्या लोकांमध्ये संयम व धैर्य असते, त्यांना गायत्री देवतेचा आशीर्वाद लाभतो. गायत्री देवीचे वाहन हंस आहे. हंसात दूध आणि पाणी वेगवेगळे करण्याचा गुण आहे. म्हणून आजच्या युगात हंसाचा हा गुण मनुष्याने आत्मसात केला पाहिजे, असेही ते म्हणाले.