शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

युवकाची दगडाने ठेचून हत्या; आरोपी आठ तासांत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना नेहरू पार्क चौकात घडले हत्याकांड अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू पार्क चौकात ...

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नेहरू पार्क चौकात घडले हत्याकांड

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू पार्क चौकात एका ३२ वर्षीय युवकाची हत्या त्याच्या साथीदाराने केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या हत्याकांडातील आरोपीस अकोला पोलिसांनी आठ तासांच्या आतच जेरबंद केले. त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

खदान परिसरातील शासकीय गोदाममागे रहिवासी असलेले श्याम शंकर घोडे यांची उत्तर प्रदेशातील रामपूर येथील रहिवासी सुमितकुमार राजेश कुमार शर्मा याने शनिवारी मध्यरात्री दगडाने ठेचून हत्या केली. या दोघांनी सोबतच नशा केल्यानंतर नशेतच शर्मा याने घोडे याच्या डोक्यावर दगड टाकला. यामध्ये घोडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी शर्मा हा घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती रविवारी पहाटे खदान पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांकडून घटनास्थळ पंचनामा केला. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आठ तासांच्या आतच आरोपी सुमितकुमार शर्मा यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणातील आरोपीस सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

घटनास्थळावर आढळल्या चिलमी

नेहरू पार्क चौकात ज्या ठिकाणी श्याम घोडे यांचा मृतदेह पडून होता. त्याच बाजूला नशेसाठी वापरलेल्या दोन चिलमी पोलिसांना आढळले आहे. त्या चिलमी पोलिसांनी जप्त केले आहेत. यावरून मृतक व आरोपीने सोबतच नशा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. नशेतच हे हत्याकांड घडलेची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

क्षुल्लक कारणावरून झाली हत्या

नेहरू पार्क चौकात श्याम घोडे व त्याचा साथीदार सुमित कुमार शर्मा या दोघांनी सोबतच नशा केली. त्यानंतर किरकोळ वाद दोघांमध्ये निर्माण झाले. या किरकोळ वादातून सुमित कुमार शर्मा याने बाजूलाच पडलेला दगड उचलून क्षणातच त्या घोडे याच्या डोक्यात घातला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत किरकोळ कारणातून हत्याकांड झाले. यापूर्वी तपे हनुमान मंदिरानजीक अशाप्रकारे नशेत एका मित्राने दुसर्‍याची हत्या केल्याचे प्रकरण घडले होते.