शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

राजकारणात युवकांचा पुढाकार हवा

By admin | Updated: October 9, 2014 01:07 IST

अकोला लोकमत परिचर्चा; विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर युवकांनी केल्या अपेक्षा व्यक्त.

अकोला : राजकारणाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा चांगला नाही. राजकारणाला बदनाम करण्याचे काम काही मूठभर लोकांनी केले. राजकारणाचे स्वरूप बदलण्यासाठी युवकांनी आता राजकारणात उतरले पाहिजे. युवकांनी राजकारण हातात घेतल्याशिवाय राजकारणाचे शुद्धीकरण होणार नाही, असे मत विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर लोकमतने आयोजित केलेल्या परिचर्चेत युवकांनी व्यक्त केले. बुधवारी लोकमत कार्यालयात ह्यराजकारण आणि युवकह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत उपमहापौर व युवा सेनेचे पदाधिकारी विनोद मापारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर उपाध्यक्ष बुढन गाडेकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हर्षवर्धन देशपांडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अविनाश चव्हाण, शंकरलाल खंडेलवाल विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी राजदीप टोहरे, विराट ग्रुपचे अध्यक्ष कुणाल शिंदे व मास्टर पॉवर जीमचे संचालक मनोज पाटील यांनी सहभाग घेतला. सर्वच वक्त्यांनी राजकारणात बदल घडवून आणण्याची क्षमता युवकांमध्येच असून, त्यासाठी अधिकाधिक युवकांनी राजकारणात आले पाहिजे, असे मत व्यक्त केले. आज निवडणुका आल्या की युवकांना भुलविण्याचे काम केले जाते. युवकांचा उपयोग गर्दी वाढविण्यासाठी केला जातो. उमेदवारांकडून मोठय़ा प्रमाणात युवकांचा वापर केला जातो. युवकाला आपल्याकडे वळविण्यासाठी त्याला विविध प्रलोभने दिली जातात; परंतु निवडणूक झाल्यावर तोच युवक बेरोजगार म्हणून चौकात पानटपरीवर रिकामी कामे करीत असतो. यातूनच गुन्हेगारी बळावते. आपल्या जाहीरनाम्यात युवकांसाठी रोजगाराची आश्‍वासने देणारे पक्ष निवडून आल्यावर युवकांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप या युवकांनी केला. राजकारणाचे स्वरूप बदलण्यासाठी युवकांनी राजकारणात यावे, अशी अपेक्षा या युवकांनी व्यक्त केली.