शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

तरुणांनी संवेदनशीलतेसोबतच संयम ठेवावा : राजन वेळूकर

By admin | Updated: December 25, 2016 02:44 IST

श्री शिवाजी महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

अकोला, दि. २४- २१ व्या शतकात पदार्पण करताना खूप मोठी स्पर्धा राहणार आहे. त्या स्पर्धेत तरुणांनी एकट्याने सफलता मिळवून चालणार नाही. सगळ्य़ांना घेऊन चालण्यासोबतच तरुणांनी संवेदनशीलतेसोबतच संयम बाळगायला हवा, असे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी येथे सांगितले. डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती व स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन डॉ. वेळूकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे होते. अतिथी म्हणून राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे सल्लागार अंबादास मोहिते उपस्थित होते. मंचावर उपप्राचार्य डॉ. एस.पी.रोठे, प्रा.डॉ. एम.आर. इंगळे, डॉ. आशिष राऊत, डॉ. अनिल राऊत, डॉ. उल्हास मेडशीकर उपस्थित होते. पुढे बोलताना, डॉ. वेळूकर यांनी कार्यक्रम वीर जवानांना सर्मपित केला आहे, तर भारतीय जवानांचा खंबीरपणा व प्रामाणिकपणा हा गुण तरुणांनी आत्मसात केला पाहिजे. देशातील सर्व लढाया युवाशक्तीच्या जोरावरच झाल्या आहेत. युवकांचे सार्मथ्य आणि बुद्धीच्या जोरावरच देश महासत्ता होऊ शकतो, असा विश्‍वासही व्यक्त केला. शिक्षणाने माणसामध्ये विनम्रता आली नाही, तर ते बिनकामाचे समजावे, असेही ते म्हणाले. ह्यरुसाह्णचे सल्लागार अंबादास मोहिते यांनी आज समाज व देशाची स्थिती अंत्यत गंभीर आहे. २१ व्या शतकातदेखील आपण जात-पात, धर्म यामध्ये एवढे अडकून पडलो, की देशाचे तुकडे व्हायची वेळ आली आहे. केवळ देशाच्या संविधानामुळे देश अखंड आहे. त्यासाठी आजच्या युवापिढीने जाती-पातीच्या बेड्या फेकून देऊन समतामुलक समाजाची रचना करणे, मानवता धर्म बाळगण्याचा उद्देश ठेवावा, आपल्याला कॅशलेस नव्हे, तर ह्यकास्टलेसह्ण सोसायटी हवी, असेही ते म्हणाले. प्राचार्य डॉ. भडांगे यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण आणि वसतिगृह सुविधा आहे. ती यापुढे शहीद जवानांच्या मुलांसाठीही असेल, असे सांगितले. प्रास्ताविक कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. प्रतीक्षा कोकाटे यांनी केले. यावेळी प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झालेली अनुराधा ठाकरे, बॉक्सिंगसाठी निवड झालेले ऋत्विक शिंदे, अजय पेंदोर यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विद्यार्थी विशाल नंदागवळी यांनी, तर आभार प्राजक्ता सवाई यांनी मानले.