शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

युवा महोत्सवात तरुणाईचा जल्लोष!

By admin | Updated: September 27, 2016 02:51 IST

डॉ. पंदेकृवि युवा महोत्सवास प्रारंभ; २0 महाविद्यालये, २५0 विद्यार्थ्यांंचा सहभाग.

अकोला, दि. २६- महाविद्यालयीन युवक, युवतींच्या सुप्त गुणांना वाव देत, शिक्षणासोबतच सर्वांंंगीण विकास साध्य करण्याच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांंंच्या कला- गुणांना वाव देणार्‍या रंगारंग युवा महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी तरुणाईने जल्लोष केला. तीन दिवस चालणार्‍या या महोत्सवात २0 महाविद्यालयातील २५0 विद्यार्थ्यांंंनी सहभाग घेतला आहे.२६ ते २८ सप्टेंबर या तीन दिवसीय युवा महोत्सवाची रंगारंग सुरुवात कृषी महाविद्यालयाच्या स्व. डॉ . के. आर. ठाकरे सभागृहात संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी डॉ. व्ही. एम. भाले यांच्या शुभहस्ते झाली. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस.एस. माने यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या सोहळ्यात विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी संजय कोकाटे, युवा महोत्सवाचे संयोजक डॉ. एस. के. अहेरकर, कृ. म. वि. जिमखाना उपाध्यक्ष डॉ. पी. बी. उमाळे यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांंंनी अभ्यासासोबतच आपल्या अंगभूत कला-गुणांचा आविष्कार घडविण्यासाठी या महोत्सवाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन डॉ. भाले यांनी या प्रसंगी केले तर स्पर्धेमधील नियम, अटी आणि शिस्त यावर विद्यार्थी कल्याण अधिकारी संजय कोकाटे यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. माने यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या सहभागाची नोंद घेऊन आंतर विद्यापीठीय स्पर्धेकरिता सिद्ध होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ श्रीकांत अहेरकर यांनी तर संचालन डॉ. राजेश शेळके यांनी केले. डॉ. संदीप लांबे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. अशा होतील स्पर्धा या युवा महोत्सवाकरिता विद्यापीठा अंतर्गत एकूण २0 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला असून जवळपास २५0 विद्यार्थी, विद्यार्थिनी आपले कला गुण प्रदर्शित करणार आहेत. यामध्ये गीत गायन, नाटक, देशभक्तीपर गीत, चित्रकला, रांगोळी, पोस्टर, क्ल्ये मोडेलिंग, आदींसह माईम, नृत्य, एकपात्री अभिनव प्रयोग, मिमिक्री, नाटक, इत्यादींसह बौद्धिक खाद्य पुरविणारी वादविवाद स्पर्धा, उत्स्फूर्त भाषणे, कविता, रिसायटेशन आदी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांंंनी कृषी महाविद्यालायाचा परिसर बहरून गेला असून आपली कौशल्ये, कसब दाखविण्यासाठी विद्यार्थी सरसावले आहेत.