शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

रुग्णवाहिका बंद पडल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:15 IST

अकोट : आजारी असलेल्या रुग्णाला उपचारार्थ अकोला येथे घेऊन जाणारी रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे रुग्णाचा उपचाराला पोहपचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना ...

अकोट : आजारी असलेल्या रुग्णाला उपचारार्थ अकोला येथे घेऊन जाणारी रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे रुग्णाचा उपचाराला पोहपचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना दि. २ एप्रिल रोजी अकोट-अकोला मार्गावर घडली. रोशन निरंजन पळसपगार (१९), असे मृत रुग्णाचे नाव आहे.

अकोट तालुक्यातील वणीवारुळा येथील रोशन निरंजन पळसपगार (१९) हा युवक आजारी असल्याने अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आला होता. त्याची प्रकृती गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालयाने (क्र. एमएच १४ सीएल ०८१३) १०८ रुग्णवाहिकेतून अकोला येथे पाठविले. अकोट-अकोला मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाने जात असताना पळसोद फाट्यानजीक रुग्णवाहिकाचे मागील चाक पंक्चर झाल्याने रुग्णवाहिका बंद पडली. रुग्णवाहिकेमध्ये पर्यायी स्टेपनी उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका जागीच बंद होती. दुसरा पर्याय शोधण्यास रुग्णवाहिकेला तब्बल २ तास ३० मिनिटे वेळ लागला. या वेळेत प्रकृती गंभीर असलेल्या रोशनचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. रुग्णवाहिकेत पर्यायी व्यवस्था असती, तर वेळेवर रुग्णाला उपचार भेटून रुग्ण वाचला असता; परंतु रुग्णवाहिका सुसज्ज नसतानाही चालकाने निष्काळजी केल्याचे दिसून येत आहे. रुग्णासाठी अन्य वाहन उपलब्ध केले नसल्याने रुग्णवाहिकेतच युवकाला जीव गमावावा लागल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ग्रामीण रुग्णालयातून अकोला येथील रुग्णालयामध्ये घेऊन जात असतानाच रुग्णाची परिस्थिती खूप नाजूक होती. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांकडून लिहून घेतले होते. रुग्णवाहिकेचे चाक पंक्चर झाले. दुसरी पर्यायी व्यवस्था नव्हती, तसेच दुसरी रुग्णवाहिका यायला वेळ लागल्यामुळे रुग्ण दगावला, अशी प्रतिक्रिया रुग्णवाहिकेसोबत असलेल्या डॉ. रेशमा कंकाळ यांनी दिली.

-------------------------------

अकोट-अकोला मार्ग आणखी कितींचा बळी घेणार?

अकोट-अकोला मार्गाची दुर्दशा झाली आहे. या मार्गाचे काम तातडीने करण्यासाठी कंत्राटदार दिरंगाई करीत आहे. रस्त्यावर गिट्टी, दगड पडलेले असून, अनेकदा वाहने पंक्चर होत आहेत. दरम्यान, रुग्णवाहिका पंक्चर झाल्याने युवकाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला. अकोट-अकोला मार्ग आणखी किती जणांचा बळी घेणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे, तसेच रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा व कंत्राटदाराच्या कामचुकारपणामुळे अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.