शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी निबंध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:19 IST

अकोला : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राज्यभर २ ते १५ आॅक्टोबर दरम्यान निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राज्यभर २ ते १५ आॅक्टोबर दरम्यान निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यात १३ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता हॉटेल शहनाई येथे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे माहिती प्रदेश सचिव सागर कावरे यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेत दिली. ‘गांधीजी मला भेटले’, ‘गांधीजी, जे मला समजलेले’, ‘गांधीवाद-वैश्विक शांततेसाठी सर्वोत्तम पर्याय’, ‘असहकार आणि छोडो भारत, या संकल्पनांची आज आवश्यकता आहे का?’ या विषयांवर ही स्पर्धा होणार असून, यासाठी भाषेचे बंधन नाही. इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा आहे. विजेत्यांना प्रथम - ३००१ रु., द्वितीय - २००१ रु., व तृतीय १००१ रु. असे बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अंशुमन देशमुख यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला सागर कावरे, अंशुमन देशमुख, फैसल खान, अमोल काळणे आदी पदाधिकारी उपस्थित होेते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल सारवान, आकाश सिरसाट, शेख कलीम, सुमती गवई आदी कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधी