शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

तुरीचे भाव गेले १0 हजार रुपये क्विंटलवर!

By admin | Updated: August 16, 2015 23:52 IST

जेवणामध्ये डाळीचाआस्वाद होणार महाग !

अकोला : तुरीचे भाव अचानक वधारले असून, १0 हजार रुपये क्विंटलप्रमाणे बाजारात खरेदी सुरू आहे. तुरीचे भाव वधारल्याने तूर डाळीच्या दरात प्रतिक्विंटल १0 ते १२ हजार रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे गरीब, सामान्य लोकांना जेवणामध्ये डाळीचा आस्वाद घेणे कठीण झाले आहे. देशात गरजेएवढे तुरीचे उत्पादन होत नसल्याने डाळवर्गीय पिकात तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या डाळवर्गीय उत्पादन संचालनालयाने या पिकाच्या लागवडीवर भर दिला आहे. या डाळीत प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण, आदिवासी भागातील जनतेला तूर डाळ मिळण्यासाठी बिल गेटस फाउंडेशनने देशातील काही विद्यापीठांना निधी उपलब्ध केला होता. यात अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालाही निधी उपलब्ध करू न दिला होता, असे असले तरी आजमितीस देशात तुरीचे एकूण क्षेत्र हे ३९ लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्रात हे क्षेत्र ११ लाख हेक्टर आहे. पण उत्पादकतेचे प्रमाण कमी आहे. देशातील तुरीच्या डाळीची गरज भागविण्यासाठी या डाळीची आयात ब्रह्मदेशातून करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या तुरीचा पुरवठा कमी झाला असून, मागणी मात्र वाढल्याने तुरीच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात तुरीचे भाव ४३00 रुपये प्रतिक्विंटल होते. यंदा सुरुवातच साडेसहा हजार रुपये क्विंटलने झाली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही वाढ ७ हजार ते ८ हजार ७00 पर्यंत पोहोचली होती, तर १४ ऑगस्ट रोजी हे दर ९,२00 रुपयांच्यावर पोहोचले होते. दरम्यान, तुरीचे दर अचानक वाढल्याने तूर डाळीच्या दरातही वृद्धी झाली असून, तूर डाळीचे प्रतिक्विंटल भाव आजमितीस १0 ते १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दरवाढीमुळे गोरगरीब, सामान्याच्या आहारातून तूर डाळ बाद झाली आहे.

*डाळीचे उत्पादन घटले!

           मागील वर्षी अल्प पावसाचा फटका बसल्याने तुरीचे उत्पादन घटले आहे. केवळ कर्नाटक राज्यात चांगले उत्पादन झाल्याने आजपर्यंत देशात भाव स्थिर होते. मागणी वाढली असून, पुरवठा कमी आहे. आता विदेशातील दोनच कंपन्यांकडे तूर आहे.