शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

वनसंवर्धनातच आपले संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर होऊन शेतशिवारात येत आहेत. मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत ...

बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर होऊन शेतशिवारात येत आहेत. मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत वाघ, बिबट, माकडे, नीलगाय आदी वन्य प्राणी शिरल्याच्या घटना आपण नेहमीच पाहत आहोत. पर्यावरणाचा खरा ऱ्हास हा जंगलतोडीमुळेच आहे. पर्यावरणाची ही हानी भरून काढायची असेल तर झाडे लावून जगविणे आणि जंगलाचे संवर्धन करणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. एकेकाळी महाराष्ट्र हे ‘महावनराष्ट्र’ होते. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी जगद्‌गुरू तुकाराम महाराज यांनी वृक्षांना सोयरे संबोधले. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा वृक्षलागवड व संवर्धनाबाबत स्वतंत्र आज्ञापत्र काढून वृक्षतोड करण्यावर सक्त बंदी घातली होती; परंतु कालांतराने मात्र आपण वनांचे महत्त्व जाणून घेण्यात व त्यांचे संवर्धन करण्यात कमी पडलो. भारतासारख्या कृषिप्रधान राष्ट्रात तर वनांचे महत्त्व अधिक आहे. वनांच्या संरक्षणात्मक, उत्पादक आणि आर्थिक क्षमतेमुळे त्यांना शेतकी अर्थव्यवस्थेत मोलाचे स्थान आहे. प्रगत राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक भरभराटीत समुद्ध वनांनी फार मोठा हातभार लावला असतानाच एकेकाळी उन्नत असलेले मेसापोटेमिया, सिरिया व पॅलेस्टाइन आदी सुपीक प्रदेश अविवेकी वनसंहाराने उजाड झाले आहेत. हवामान बदलांशी जुळवून घेणे, तसेच जैवविविधतेच्या रक्षण करण्याच्या कामी वनपरिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते.

..............

आपल्या राज्याला, ‘महावनराष्ट्र’ करण्यासाठी वनसंवर्धनाबरोबर जैवविविधता जतन करणे गरजेचे आहे. ‘वृक्षवल्लीं’ना आपले आप्तस्वकीय मानून त्यांना आधार देणे हे निसर्गकार्य जगातल्या प्रत्येक नागरिकाने करावे, त्याशिवाय नद्या, नाले नि झरे खळखळून वाहणार नाहीत.

...................................

यादव तरटे पाटील

सदस्य महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ