शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

वनसंवर्धनातच आपले संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर होऊन शेतशिवारात येत आहेत. मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत ...

बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर होऊन शेतशिवारात येत आहेत. मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत वाघ, बिबट, माकडे, नीलगाय आदी वन्य प्राणी शिरल्याच्या घटना आपण नेहमीच पाहत आहोत. पर्यावरणाचा खरा ऱ्हास हा जंगलतोडीमुळेच आहे. पर्यावरणाची ही हानी भरून काढायची असेल तर झाडे लावून जगविणे आणि जंगलाचे संवर्धन करणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. एकेकाळी महाराष्ट्र हे ‘महावनराष्ट्र’ होते. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी जगद्‌गुरू तुकाराम महाराज यांनी वृक्षांना सोयरे संबोधले. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा वृक्षलागवड व संवर्धनाबाबत स्वतंत्र आज्ञापत्र काढून वृक्षतोड करण्यावर सक्त बंदी घातली होती; परंतु कालांतराने मात्र आपण वनांचे महत्त्व जाणून घेण्यात व त्यांचे संवर्धन करण्यात कमी पडलो. भारतासारख्या कृषिप्रधान राष्ट्रात तर वनांचे महत्त्व अधिक आहे. वनांच्या संरक्षणात्मक, उत्पादक आणि आर्थिक क्षमतेमुळे त्यांना शेतकी अर्थव्यवस्थेत मोलाचे स्थान आहे. प्रगत राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक भरभराटीत समुद्ध वनांनी फार मोठा हातभार लावला असतानाच एकेकाळी उन्नत असलेले मेसापोटेमिया, सिरिया व पॅलेस्टाइन आदी सुपीक प्रदेश अविवेकी वनसंहाराने उजाड झाले आहेत. हवामान बदलांशी जुळवून घेणे, तसेच जैवविविधतेच्या रक्षण करण्याच्या कामी वनपरिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते.

..............

आपल्या राज्याला, ‘महावनराष्ट्र’ करण्यासाठी वनसंवर्धनाबरोबर जैवविविधता जतन करणे गरजेचे आहे. ‘वृक्षवल्लीं’ना आपले आप्तस्वकीय मानून त्यांना आधार देणे हे निसर्गकार्य जगातल्या प्रत्येक नागरिकाने करावे, त्याशिवाय नद्या, नाले नि झरे खळखळून वाहणार नाहीत.

...................................

यादव तरटे पाटील

सदस्य महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ