शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वनसंवर्धनातच आपले संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर होऊन शेतशिवारात येत आहेत. मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत ...

बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर होऊन शेतशिवारात येत आहेत. मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत वाघ, बिबट, माकडे, नीलगाय आदी वन्य प्राणी शिरल्याच्या घटना आपण नेहमीच पाहत आहोत. पर्यावरणाचा खरा ऱ्हास हा जंगलतोडीमुळेच आहे. पर्यावरणाची ही हानी भरून काढायची असेल तर झाडे लावून जगविणे आणि जंगलाचे संवर्धन करणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. एकेकाळी महाराष्ट्र हे ‘महावनराष्ट्र’ होते. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी जगद्‌गुरू तुकाराम महाराज यांनी वृक्षांना सोयरे संबोधले. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा वृक्षलागवड व संवर्धनाबाबत स्वतंत्र आज्ञापत्र काढून वृक्षतोड करण्यावर सक्त बंदी घातली होती; परंतु कालांतराने मात्र आपण वनांचे महत्त्व जाणून घेण्यात व त्यांचे संवर्धन करण्यात कमी पडलो. भारतासारख्या कृषिप्रधान राष्ट्रात तर वनांचे महत्त्व अधिक आहे. वनांच्या संरक्षणात्मक, उत्पादक आणि आर्थिक क्षमतेमुळे त्यांना शेतकी अर्थव्यवस्थेत मोलाचे स्थान आहे. प्रगत राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक भरभराटीत समुद्ध वनांनी फार मोठा हातभार लावला असतानाच एकेकाळी उन्नत असलेले मेसापोटेमिया, सिरिया व पॅलेस्टाइन आदी सुपीक प्रदेश अविवेकी वनसंहाराने उजाड झाले आहेत. हवामान बदलांशी जुळवून घेणे, तसेच जैवविविधतेच्या रक्षण करण्याच्या कामी वनपरिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते.

..............

आपल्या राज्याला, ‘महावनराष्ट्र’ करण्यासाठी वनसंवर्धनाबरोबर जैवविविधता जतन करणे गरजेचे आहे. ‘वृक्षवल्लीं’ना आपले आप्तस्वकीय मानून त्यांना आधार देणे हे निसर्गकार्य जगातल्या प्रत्येक नागरिकाने करावे, त्याशिवाय नद्या, नाले नि झरे खळखळून वाहणार नाहीत.

...................................

यादव तरटे पाटील

सदस्य महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ