शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

यावर्षीही शेतीमध्ये ‘पीपीपी’ पॅटर्न

By admin | Updated: May 22, 2015 01:51 IST

कापूसाचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभाग यंदा उत्पादन वाढ प्रकल्प राबविणार.

अकोला : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यात शासकीय व खासगी भागीदारीने (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) उत्पादन वाढ प्रकल्प राबविण्यात आला आहे. यंदाही हा प्रकल्प राज्यासह विदर्भात राबविण्यात येणार असल्याचे वृत्त असून, यामध्ये विविध आठ पिकांसह कापूस या महत्त्वपूर्ण पिकाचा समावेश करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र अधिक असून, उत्तर महाराष्ट्रात जळगाव खान्देश या भागात कापसाचे पीक घेतले जात आहे. या पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्याचे कृषी विभागाचे मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी वर्‍हाडातील अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्हय़ात हा प्रकल्प राबविला आहे. या प्रकल्पामुळे अमरावती जिल्हय़ातील दर्यापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा एका खासगी कापूस बियाणे कंपनीसोबत करार करण्यात आला होता. या माध्यमातून शेतकर्‍यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. यंदा सुद्धा हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, खासगी नामांकित बियाणे कंपन्यांसोबत शासनाने हा करार केला आहे. या खासगी बियाणे कंपन्या शेतकर्‍यांना उत्कृष्ट निविष्ठा,तंत्रज्ञान व बियाणे पेरणी व शेती उत्पादनासाठी लागणारे महत्त्वाचे प्रशिक्षण देणार आहेत. खते, कीटकनाशके कधी व किती प्रमाणात वापरावी, यासाठीचे सर्व प्रशिक्षण हे या खासगी कंपन्यांचे शास्त्रज्ञ शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शेतावर देणार आहेत. याकरिता कृषी मंत्रालयाने निधीची तजवीज केली आहे. खासगी कंपन्यांसोबत याबाबतचा करार केला आहे. दरम्यान, मागील खरीप हंगामात पश्‍चिम विदर्भातील बुलडाणा जिल्हय़ातील कापूस या पिकासाठी एका खासगी कंपनीशी करार केला होता. या करारानुसार १६४0 हेक्टर क्षेत्रावर त्या कंपनीचे कापूस बियाणे लागवड करण्यात आली होती. या प्रकल्पावर ७३ लाख रुपये खर्च करण्यात आले, तसेच या विभागात सोयाबीन व मका या पिकांसाठी हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. शासकीय, खासगी व शेतकरी असा हा उत्पादन वाढ प्रकल्प असूून, या प्रकल्पांतर्गत खासगी कंपनी, शेतकरी व शासनाचा निधी असतो. या प्रकल्पांतर्गत नामांकित खासगी व शासकीय बियाणे कंपन्या शेतकर्‍यांना निविष्ठा, खते, कीटकनाशकांचा वापर व इतर पेरणीसंदर्भातील माहिती प्रत्यक्ष देतात. यंदा हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांनी सांगीतले.