शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अभ्यासविनाच गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष, यावर्षीही परिस्थिती तशीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST

अकाेला : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठीच्या प्रकियेला ११ जूनपासून प्रारंभ हाेत आहे. ...

अकाेला : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठीच्या प्रकियेला ११ जूनपासून प्रारंभ हाेत आहे. काेराेना संकटामुळे गेल्यावर्षी प्रवेश झालेल्या गरीब विद्यार्थ्यांना शाळेत न जाताच अभ्यासविनाच हे शैक्षणिक सत्र पार पाडावे लागले.

जिल्ह्यात आरटीईअंतर्गत १ हजार ९६० जागा असून, ४ हजार ७०७ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले हाेते. त्यातून पहिल्या टप्प्यात १ हजार ८१७ विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड झाली आहे

खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांमुळे गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत शिकता येणे शक्य झाले आहे.

बाॅक्स....

आरटीईमुळे गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या चांगल्या शाळेत शिकण्याची संधी मिळाली, मात्र गेल्या वर्षभरात काेराेनामुळे या शाळा ऑनलाइनच हाेत्या. अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक साधनाची कमतरता आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाने साधने पुरविण्याची गरज आहे. त्या करिता सरकारने अशा विद्यार्थ्यांची शाळांकडून माहिती घेऊन साधने पुरवावे, अशी मागणी श्याम कुलट यांनी केली आहे. साेडतीमध्ये संधी मिळालेल्या पाल्यांचे मूळ कागदपत्रे, छायांकित प्रती व अन्य दस्तावेज याची पडताळणी शाळेत हाेणार आहे. यावेळी पालकांना सहकार्याची भूमिका संस्थांनी घ्यावी, अशी अपेक्षाही कुलट यांनी व्यक्त केली आहे

पालक म्हणतात...

आरटीईमधून मुलाला काॅन्व्हेंटमध्ये प्रवेश मिळाला मात्र शाळेत जाण्याचा याेग काेराेनामुळे आलाच नाही. त्यामुळे मुलाचा हिरमाेड झाला.

संदीप वानखडे

अकाेला शहरातील चांगल्या शाळेत लाॅटरी पद्धतीने मुलीची निवड झाली, मात्र शाळेने इतर शुल्काच्या नावाखाली फी पाठविली हाेती काेराेनामुळे फी भरण्याचे काम पडले नाही, मात्र याबाबत शिक्षण विभागाने दखल घेण्याची गरज आहे.

सतीश उमक

शिक्षणाधिकारी म्हणतात

आरटीईअंतर्गत प्रवेशाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनायाने प्रक्रिया राबविण्याबाबतचा आदेश दिला आहे त्यानुसार ११ जूनपासून प्रक्रिया हाेत आहे निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २० दिवसांचा कालावधी देण्यात यावा असे आदेश असून, शाळेतच कागदपत्रांची पडताळणी हाेणार आहे.

डाॅ. वैशाली ठग

शिक्षणाधिकारी प्राथमिक

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

नोंदणी केलेल्या शाळा - २०२

एकूण जागा - १ हजार ९६०

आलेले अर्ज - ४७०७