शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

नाफेडच्या हरभरा खरेदीला मुदतवाढ रणजित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

By admin | Updated: May 20, 2014 23:58 IST

अकोला : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वेळेवर मदत न देणार्‍या शासनाने शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देताच नाफेडची हरभरा खरेदी बंद केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात हरभरा खरेदी सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. डॉ. पाटील यांच्या इशार्‍यानंतर नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे.

अकोला : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वेळेवर मदत न देणार्‍या शासनाने शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देताच नाफेडची हरभरा खरेदी बंद केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात हरभरा खरेदी सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. डॉ. पाटील यांच्या इशार्‍यानंतर नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे.आधीच गारपीट व अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता नाफेडने १० मेपासून हरभरा खरेदी बंद केली होती. हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर टाकण्याचा प्रताप नाफेडने केला होता. या प्रकारामुळे शेतकर्‍यांसमोर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांना अणखी एका संकटाचा सामना करावा लागत असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी दोन दिवसात हरभर्‍याची खरेदी सुरू न केल्यास शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा कृषीमंत्री शरद पवार यांना दिला होता. यासोबतच शासनाला पत्र पाठवून हरभरा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. आ. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे. नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या यंत्रणेने मुदतवाढ देण्याची कुठलीही माहिती शेतकर्‍यांना दिली नाही. वृत्तपत्रातून जाहिरात किंवा इतर कुठल्याही मार्गाने नाफेडने हरभर्‍याच्या खरेदीला मुदतवाढ मिळाल्याची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविली नाही. याबाबत डीएमओ यांच्याशी डॉ. रणजित पाटील यांनी संपर्क साधला असता यंत्रणेकडून निर्देश मिळाल्यानंतरही काही केंद्रांवर अद्यापही हरभरा खरेदी सुरू करण्यात आली नसल्याची त्यांना माहिती मिळाली. या कार्यालयातील कारभार पुरता ढेपाळला असून, शेतकर्‍यांविषयी कुठलाही कळवळा या कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना नसल्याचा आरोपही आ. डॉ. रणजित पाटील यांनी केला आहे.** तुरीचे चुकारे तत्काळ द्या - आ. पाटीलशेतकर्‍यांचे तुरीचे चुकारे मागील तीन महिन्यांपासून देण्यात आलेले नसून, हे चुकारे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी डॉ. रणजित पाटील यांनी केली आहे. थकीत असलेले तुरीचे चुकारे खरीप पेरणीच्या आधी देऊन शेतकर्‍यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणीही त्यांनी केली.