शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नाफेडच्या हरभरा खरेदीला मुदतवाढ रणजित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

By admin | Updated: May 20, 2014 23:58 IST

अकोला : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वेळेवर मदत न देणार्‍या शासनाने शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देताच नाफेडची हरभरा खरेदी बंद केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात हरभरा खरेदी सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. डॉ. पाटील यांच्या इशार्‍यानंतर नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे.

अकोला : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वेळेवर मदत न देणार्‍या शासनाने शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देताच नाफेडची हरभरा खरेदी बंद केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात हरभरा खरेदी सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. डॉ. पाटील यांच्या इशार्‍यानंतर नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे.आधीच गारपीट व अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता नाफेडने १० मेपासून हरभरा खरेदी बंद केली होती. हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर टाकण्याचा प्रताप नाफेडने केला होता. या प्रकारामुळे शेतकर्‍यांसमोर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांना अणखी एका संकटाचा सामना करावा लागत असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी दोन दिवसात हरभर्‍याची खरेदी सुरू न केल्यास शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा कृषीमंत्री शरद पवार यांना दिला होता. यासोबतच शासनाला पत्र पाठवून हरभरा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. आ. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे. नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या यंत्रणेने मुदतवाढ देण्याची कुठलीही माहिती शेतकर्‍यांना दिली नाही. वृत्तपत्रातून जाहिरात किंवा इतर कुठल्याही मार्गाने नाफेडने हरभर्‍याच्या खरेदीला मुदतवाढ मिळाल्याची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविली नाही. याबाबत डीएमओ यांच्याशी डॉ. रणजित पाटील यांनी संपर्क साधला असता यंत्रणेकडून निर्देश मिळाल्यानंतरही काही केंद्रांवर अद्यापही हरभरा खरेदी सुरू करण्यात आली नसल्याची त्यांना माहिती मिळाली. या कार्यालयातील कारभार पुरता ढेपाळला असून, शेतकर्‍यांविषयी कुठलाही कळवळा या कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना नसल्याचा आरोपही आ. डॉ. रणजित पाटील यांनी केला आहे.** तुरीचे चुकारे तत्काळ द्या - आ. पाटीलशेतकर्‍यांचे तुरीचे चुकारे मागील तीन महिन्यांपासून देण्यात आलेले नसून, हे चुकारे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी डॉ. रणजित पाटील यांनी केली आहे. थकीत असलेले तुरीचे चुकारे खरीप पेरणीच्या आधी देऊन शेतकर्‍यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणीही त्यांनी केली.