शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नाफेडच्या हरभरा खरेदीला मुदतवाढ रणजित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

By admin | Updated: May 20, 2014 23:58 IST

अकोला : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वेळेवर मदत न देणार्‍या शासनाने शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देताच नाफेडची हरभरा खरेदी बंद केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात हरभरा खरेदी सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. डॉ. पाटील यांच्या इशार्‍यानंतर नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे.

अकोला : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वेळेवर मदत न देणार्‍या शासनाने शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देताच नाफेडची हरभरा खरेदी बंद केली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात हरभरा खरेदी सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. डॉ. पाटील यांच्या इशार्‍यानंतर नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे.आधीच गारपीट व अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता नाफेडने १० मेपासून हरभरा खरेदी बंद केली होती. हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर टाकण्याचा प्रताप नाफेडने केला होता. या प्रकारामुळे शेतकर्‍यांसमोर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांना अणखी एका संकटाचा सामना करावा लागत असताना आ. डॉ. रणजित पाटील यांनी दोन दिवसात हरभर्‍याची खरेदी सुरू न केल्यास शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा कृषीमंत्री शरद पवार यांना दिला होता. यासोबतच शासनाला पत्र पाठवून हरभरा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. आ. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली आहे. नाफेडने हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या यंत्रणेने मुदतवाढ देण्याची कुठलीही माहिती शेतकर्‍यांना दिली नाही. वृत्तपत्रातून जाहिरात किंवा इतर कुठल्याही मार्गाने नाफेडने हरभर्‍याच्या खरेदीला मुदतवाढ मिळाल्याची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविली नाही. याबाबत डीएमओ यांच्याशी डॉ. रणजित पाटील यांनी संपर्क साधला असता यंत्रणेकडून निर्देश मिळाल्यानंतरही काही केंद्रांवर अद्यापही हरभरा खरेदी सुरू करण्यात आली नसल्याची त्यांना माहिती मिळाली. या कार्यालयातील कारभार पुरता ढेपाळला असून, शेतकर्‍यांविषयी कुठलाही कळवळा या कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना नसल्याचा आरोपही आ. डॉ. रणजित पाटील यांनी केला आहे.** तुरीचे चुकारे तत्काळ द्या - आ. पाटीलशेतकर्‍यांचे तुरीचे चुकारे मागील तीन महिन्यांपासून देण्यात आलेले नसून, हे चुकारे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी डॉ. रणजित पाटील यांनी केली आहे. थकीत असलेले तुरीचे चुकारे खरीप पेरणीच्या आधी देऊन शेतकर्‍यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणीही त्यांनी केली.