शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

World Environment Day : दहशतवाद, नक्षलवादापेक्षाही पर्यावरणाची समस्या गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 13:25 IST

भविष्यात दहशतवाद, नक्षलवादापेक्षाही पर्यावरणाची समस्या गंभीर रूप धारण करेल. असा इशाराच पर्यावरणवाद्यांनी दिला आहे.

अकोला: वाढते तापमान, जमिनीतील पाण्याची घसरत चाललेली पातळी ही आपणा सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. आॅक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वृक्ष लागवडीकडे होत असलेले दुर्लक्ष, पाण्याचा प्रचंड अपव्यय होत असल्यामुळे पर्यावरणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. भविष्यात दहशतवाद, नक्षलवादापेक्षाही पर्यावरणाची समस्या गंभीर रूप धारण करेल. असा इशाराच पर्यावरणवाद्यांनी दिला आहे.लोकमतच्यावतीने मंगळवारी पर्यावरण दिनानिमित्त परिचर्चा आयोजित केली होती. या परिचर्चेमध्ये सहभाग घेताना, पर्यावरण तज्ज्ञांनी पर्यावरणाच्या ºहासावर चिंता व्यक्त केली आणि दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वाढता वापर, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अमाप वृक्षतोड, जलसंचयाचा अभाव, अपव्यय यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसारख्या संकटांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकारसुद्धा गंभीर नाही. एकीकडे ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राबवायची आणि दुसरीकडे रस्त्यांच्या दुतर्फा असलेले वृक्ष तोडून टाकायचे आणि रस्त्यांचे काँक्रिटीकरण करायचे, अशी दुटप्पी भूमिका केंद्र व राज्य शासनाची असल्याचा आरोपही पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे. पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून प्लास्टिकवर कडेकोट बंदी, रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर, वृक्ष लागवड, जलसाक्षरतेची जनजागृती करून जलव्यवस्थापनाबाबत जनतेला जागरूक करून शालेय स्तरावर पर्यावरण मूल्ये रुजविण्याची गरज आहे. अन्यथा दहशतवाद, नक्षलवादापेक्षाही पर्यावरणाची समस्या निर्माण होण्याची भीतीही पर्यावरण तज्ज्ञांनी बोलताना व्यक्त केली.

सध्या राज्यभरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असून, त्यासाठी अमाप वृक्षतोड केली जात आहे; परंतु वृक्षतोड थांबविण्याकडे शासनाचे लक्ष नाही. विकासाचे नियोजन नाही. प्लास्टिक बंदी केली; परंतु त्याची अंमलबजावणी नाही. प्लास्टिक, थर्मोकोलपासून अनेक गंभीर आजार होतात. याबाबत जनजागृती नाही. मनुष्य पाच पट पर्यावरणाचे नुकसान करीत आहे. पिंपळ, वडासारखे वृक्ष ९0 ते ८0 टक्के आॅक्सिजन देतात; परंतु या वृक्षांची लागवड करण्यात येत नाही. त्यामुळे पर्यावरणाची समस्या गंभीर बनत आहे.-देवेंद्र तेलकर, अध्यक्ष सृष्टीवैभवनिसर्ग संवर्धन संस्था

प्रगतीचे पाऊल पुढे टाकताना आम्ही पर्यावरणाचा विचार करीत नाही. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारताने जगाला प्लास्टिक मुक्तीचा विचार दिला; परंतु प्रत्यक्षात भारतातच सर्वाधिक प्लास्टिकचा वापर होतो. पर्यावरण संरक्षणाबाबत केंद्र शासन गंभीर नाही आणि त्यासाठी केंद्र शासनाकडे कोणतेही धोरण नाही. पर्यावरणाबाबत केंद्र शासनाने धोरण बदलावे. वाढती वाहन संख्या, कारखाने, रस्त्यांचे काँक्रिटीकरण थांबवून पर्यावरण संरक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. वृक्षारोपण, पाणी अडवा, पाणी जिरवा, प्लास्टिकबंदीवर जनतेमध्ये जागरूकता हवी.-उदय वझे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञपर्यावरण संरक्षण संस्कृतीपासून आपण दूर गेलो आहोत. पर्यावरणाचे संस्कार मुलांवर होत नाहीत. शालेय स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्याची गरज आहे. झाड, पक्षी, जल हे पाहणे आनंददायी आहे. प्रत्येकाने घर, परिसरात वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. शिक्षणामध्येसुद्धा पर्यावरणाचा गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.-अमोल सावंत, संस्थापक निसर्ग कट्टा

 

टॅग्स :AkolaअकोलाWorld Environment DayWorld Environment Day